शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

संत साहित्यातील सामाजिकता ईश्वरवादाकडे गेली आणि मूल्यांकडे दुर्लक्ष झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 8:32 PM

Nagpur News संत साहित्यात सुरुवातीला असलेली सामाजिकता कालांतराने ईश्वरवादाकडे वळली आणि त्यामुळे सामाजिक मूल्यांकडे संतांचे दुर्लक्ष झाले, अशी खंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

नागपूर : संतत्वाचा विचार महाराष्ट्रानेच प्रथम दिला असून, संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाईने पहिल्यांदा ताटीच्या अभंगांमधून संताची व्याख्या केली आहे. संताला कसे सामाजिक भान असले पाहिजे, हे मुक्ताबाईने सांगितले. संत साहित्यात सुरुवातीला असलेली सामाजिकता कालांतराने ईश्वरवादाकडे वळली आणि त्यामुळे सामाजिक मूल्यांकडे संतांचे दुर्लक्ष झाले, अशी खंत संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.

शनिवारी साहित्य विहारच्या वतीने आयोजित द्विदिवसीय राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलनाचे उद्घाटन ईवा (इंडियन वॉटर वर्क्स) सभागृहात साहित्य, संस्कृती मंडळाचे प्रतिनिधी प्रसिद्ध लेखक प्रसाद कुळकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मोरे बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष डॉ. मनीषा यमसनवार, साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे, साहित्य विहार संस्थाध्यक्ष आशा पांडे, श्रीकांत गोडबोले, गायक दत्ता हरकरे उपस्थित होते. याप्रसंगी साहित्य विहारचा प्रतिष्ठेचा वार्षिक 'ज्ञानयोगी सन्मान' नागपूरच्या सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांनी पती डॉ. मधुकर आपटे यांच्यासोबत स्वीकारला.

संत साहित्याला जसे आध्यात्मिक पैलू आहे, तसेच त्याला भाषिक व सामाजिक पैलूदेखील आहेत. समाजातील स्त्रियांचा, वंचित घटकांचा उद्धार व्हावा, यासाठी संतांनी समाजाच्या भाषेत संत साहित्य निर्माण केले व समाजाचा उद्धार करण्याचे काम केले व समाजात वैचारिक परिवर्तन घडविल्याचे डॉ. सदानंद मोरे म्हणाले. याप्रसंगी लघुमाहितीपटाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. अदिती देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रगती वाघमारे यांनी संचालन केले, तर दत्ता हरकरे यांनी शारदा स्तवन सादर केले. सुजाता काळे यांनी आभार मानले.

..........

टॅग्स :literatureसाहित्य