शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

राज्यातील लाखो दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 19:34 IST

अनाथ दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारने मानवतेच्या भावनेतून कायदा करावा आणि त्यांना आधार द्यावा, या मागणीसाठी नागपूरसह विदर्भातील सामाजिक संघटना सरसावल्या आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपतींना लाखांवर दिव्यांगांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील लाखांवर अनाथ दिव्यांग मुलामुलींना वयाच्या १८ वर्षांनंतर अनुदानाअभावी आणि सरकारी नियमामुळे संस्थेबाहेर काढावे लागते. संस्थेतून बाहेर काढण्यात आलेली ही मुले पुढे बेवारसपणाचे आयुष्य जगतात. या मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारने मानवतेच्या भावनेतून कायदा करावा आणि त्यांना आधार द्यावा, या मागणीसाठी नागपूरसह विदर्भातील सामाजिक संघटना सरसावल्या आहे.ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापळकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन या संस्थांच्या वतीने ग्रामायण प्रतिष्ठानच्या पुढाकारात मंगळवारी राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांना दिव्यांग मुलांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन सोपविण्यात आले. हे निवेदन राष्ट्रपतींकडे सोपवून यावर मानवतेच्या भावनेतून निर्णय घ्यावा, अशी कळकळीची विनंतीही सामाजिक संस्थांच्या शिष्टमंडळाने खा. डॉ. महात्मे यांच्याकडे केली.या प्रसंगी ग्रामायण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत रागीट, सचिव संजय सराफ, कोषाध्यक्ष मंजुषा रागीट, सक्षम संस्थेचे डॉ. शिरीष दार्व्हेकर, भारत विकास परिषदेचे दिलीप गुळकरी, स्वीकार संस्थेचे अभय दिवे, रवींद्र गोखले, उपवन संस्थेचे राजेंद्र काळे, श्रीकांत मांडळे, सुरेश खेडकर, श्रीकांत पातुरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर आणि अंबादासपंत वैद्य मतिमंद बालगृह वझ्झर यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले होते. दिव्यांग, मतिमंद व अनाथ बालगृहात राहणाºया मुलांना शासनाच्या नियमामुळे मोठी अडचण निर्माण होते. नियमानुसार अनाथालयात वयाच्या फक्त १८ वर्षांपर्यंतच निवास करता येतो. त्यानंतर या मुलांना बाहेर पडावे लागते. पुढे यातील अनेक मुली शोषणाच्या शिकार ठरतात. रस्त्यावर भीक मागत त्यांना आयुष्य काढावे लागते. आयुष्याची १८ वर्षे सुरक्षितपणे अनाथालयात आयुष्य काढल्यावर त्यांच्या वाट्याला हे दु:ख येऊ नये, यासाठी सरकारने आपल्या कायद्यात सुधारणा करावी, या मुलांचे पुनर्वसन करावे अशी मागणी करणारे हे निवेदन आहे. डॉ. महात्मे यांनी सामाजिक संस्थांच्या या पुढाकाराबद्दल अभिनंदन केले. राष्ट्रपतींकडे हा विषय पोहचवून न्याय मिळविण्याचा आपण प्रयत्न क रू, मात्र त्यापूर्वी नियमातील तरतुदींचा अभ्यास करू, असे आश्वासन डॉ. महात्मे यांनी शिष्टमंडळाला दिले.शंकरबाबांकडून घेतली प्रेरणा१८ वर्षांवरील अनाथ, दिव्यांग मुलामुलींचे काय हा प्रश्न शंकरबाबा पापळकर गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या व्यासपीठावर मांडत आहेत. राज्यात दरवर्षी २५ हजार बेवारस मुले रस्त्यावर येतात, मात्र समाज मूकपणे पाहतो. सरकारही कायद्यावर बोट ठेवून निष्ठूरपणे वागते. हा प्रश्न मानवतेच्या भावनेतून सुटावा, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. डॉ. महात्मे यांनी मागील वर्षी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे पापळकर यांच्या प्रेरणेतून सामाजिक संस्थांनी हे पाऊल उचलले आहे.

 

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षVikas Mahatmeविकास महात्मे