शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

काळेंच्या लिखाणात समाजभावनेचा निचरा : विलास देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:59 IST

साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब व विवेकवादी विवेचन असते. डॉ. दिनेश काळे यांच्या लिखाणात समाजाचे असेच प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन अ. भा. म. साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी केले.

ठळक मुद्देकाळे यांच्या तीन पुस्तकांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब व विवेकवादी विवेचन असते. डॉ. दिनेश काळे यांच्या लिखाणात समाजाचे असेच प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन अ. भा. म. साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी केले.श्री नवयुवक स्नेह मंडळ वाचनालय , महाल यांच्यातर्फे ‘वेगळ्या वाटा आणि वळणे’ या कार्यक्रमांतर्गत नुकतेच लेखक डॉ. दिनेश काळे यांच्या पुस्तकांवर चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या कार्यक्रमात डॉ. काळे यांच्या ‘साद-पडसाद’, ‘मनातले’ व ‘कळायला लागल्यापासून’ या तीन पुस्तकांवर पत्रकार शफी पठाण आणि आर. एस. मुंडले महाविद्याालयाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. सीमा पागे यांनी भाष्य केले. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद निर्बाण उपस्थित होते. डॉ. देशपांडे पुढे म्हणाले, काळे यांनी ललित लिखाणापासून तर परराष्ट्र धोरणापर्यंत विपुल लेखन केले आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्याला कोणतेही 'लेबल' लावता येत नाही. इतक्या कमी वयात ५० वर पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. यातून त्यांचा लिखाणाचा व्यासंग स्पष्ट होतो. प्रा. सीमा पागे म्हणाल्या, डॉ. काळे या लेखकाच्या आत एक मनोचिकित्सक दडलेला आहे. यांच्या ‘साद-पडसाद’, ‘मनातले’, ‘कळायला लागल्यापासून’ या तिन्ही पुस्तकांमध्ये तो मनोचिकित्सक वेगवेगळया पातळीवर व्यक्त होत असतो. त्यांचे लिखाण हळूवार सोप्या भाषेत असल्याने ते वाचकांना लगेच आपलेसे करते. शफी पठाण यांनी पुस्तकांवर भाष्य करताना यात विशद करण्यात आलेली वर्तमान राजकीय परिस्थिती आज संक्रमणातून जात असल्याचे सांगितले. भारताच्या अर्थकारणाचा संबंध राजकारणाशी आहे, समाजकारणाचा संबंध राजकारणाशी आहे, धर्मकारणाचा संबंध राजकारणाशी आहे. त्यामुळे या देशातील कुणीही मनात असो वा नसो स्वत:ला राजकारणापासून वेगळे करू शकत नाही. परंतु नैतिकतेची सर्व बंधने मोडून आज राजकारण ज्या वळणावर पोहोचले आहे त्या वळणावर सामान्य नागरिकांनी काय करावे, याचे मार्गदर्शन काळेंच्या पुस्तकात वाचकांना मिळते, याकडेही पठाण यांनी लक्ष वेधले. प्रास्ताविक डॉ. दिशेन काळे तर संचालन अचिता देशमुख यांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर