शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

एसटीच्या मार्ग तपासणी कर्मचाऱ्यांची आता तीन वर्षांनंतर उचलबांगडी; विभागीय कार्यालयांना आदेश

By दयानंद पाईकराव | Updated: December 8, 2022 15:10 IST

गैरप्रकार टाळण्यासाठी वाहतूक महाव्यवस्थापकांचा निर्णय

नागपूर :एसटीच्या वाहकांनी (कंडक्टर) अफरातफर करू नये यासाठी आणि त्यांची बस मार्गात तपासण्यासाठी एसटी महामंडळाच्या सर्व विभागात मार्ग तपासणी पथक नेमण्यात आली आहेत. परंतु अनेक विभागात या पथकात तेच कर्मचारी आणि तेच वाहक वर्षानुवर्ष कार्यरत आहेत. त्यामुळे वाहन तपासणी कर्मचाऱ्यांचे एसटीच्या वाहकांशी मधुर संबंध निर्माण होऊ शकत असल्याने दर तीन वर्षांनी मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांची बदली करावी, असा आदेश वाहतूक महाव्यवस्थापकांनी महाराष्ट्रातील ३२ विभागांना दिला आहे.

एसटी महामंडळात प्रवाशांशी कंडक्टरचा थेट संबंध येतो. प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना तिकीट देण्याचे काम कंडक्टर करतात. प्रवाशांकडून मिळालेली रक्कम ड्युटी संपल्यानंतर ते आपापल्या डेपोत रोखपालाकडे जमा करतात. परंतु मार्गात प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना तिकीट न देण्याचे गैरप्रकार अनेकदा काही कंडक्टरकडून करण्यात येतात. त्यामुळे अशा कंडक्टरवर वचक रहावा यासाठी एसटी महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाकडून मार्गात अचानक बस उभी करून ती तपासण्यात येते. कंडक्टरने सर्व प्रवाशांना तिकीट दिले की नाही, याची तपासणी पथकातील कर्मचारी करतात. तिकीट न देता प्रवासी प्रवास करीत असल्याचे लक्षात आल्यास संबंधित प्रवाशाचे बयाण नोंदवून कंडक्टरवर कारवाई करण्यात येते. परंतु अनेक विभागात मार्ग तपासणी पथकातील कर्मचारी वर्षानुवर्ष पथकात काम करीत असल्याचे उघड झाले. त्यामुळे एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी तीन वर्षे झालेल्या मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांचे वाहकांशी मधुर संबंध निर्माण होऊ नयेत यासाठी हा महत्त्वाचा आदेश मानल्या जात आहे. या आदेशामुळे एसटी महामंडळातील गैरव्यवहारांना आळा बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तीन वर्षांनंतर बदली हा प्रशासकीय नियम

प्रशासनात काम करताना तीन वर्षांनंतर महत्त्वाच्या विभागातील कर्मचाऱ्यांची बदली करावी हा नियम आहे. मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांचे वाहकांशी हितसंबंध निर्माण होऊ नये, यासाठी दर तीन वर्षांनी त्यांची बदली करण्याचा आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. यामुळे एसटीच्या कारभारात सुसूत्रता निर्माण होईल.

- शिवाजी जगताप, वाहतूक महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ मुंबई

‘लोकमत’ने केली होती भीती व्यक्त

एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात भंडारा मार्गावरील शिवशाही बसेसच्या स्पॉट बुकिंगमध्ये गेल्या पाच वर्षांपासून गैरव्यवहार होऊन प्रवाशांना शून्य दराची तिकिटे देण्यात येत असल्याचा घोटाळा उघड झाला होता. भंडारा विभागातील मार्ग तपासणी पथकाने हा घोटाळा उघडकीस आणला होता. परंतु नागपूर विभागातील मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना हा घोटाळा कसा दिसला नाही, असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित करून नागपूरच्या मार्ग तपासणी पथकात अनेक वर्षांपासून तेच कर्मचारी कार्यरत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त मुंबईतील एसटीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्यानंतर मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांची तीन वर्षांनी बदली करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

टॅग्स :state transportएसटीEmployeeकर्मचारी