शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
5
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
6
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
7
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
8
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
9
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
10
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
11
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
12
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
13
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
14
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
15
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
16
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
17
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
18
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
19
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
20
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

संपकरी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन, 'एकच मिशन जुनी पेन्शन'च्या घोषणांनी परिसर दणाणला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:06 IST

सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा 7 वा दिवस. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा याचाच भाग म्हणून थाळी बाजाव आंदोलन करण्यात आले.

नागपूर : जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचारीसंपावर आहेत. सोमवारपासून (दि. २०) संपाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. संपाबाबत अजुनही तोडगा निघालेला नाही. शासकीय कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यांनी दुसऱ्या आठवड्यातील आंदोलनाची रूपरेषाही ठरवली असून सोमवारी संविधान चौकात थाळीनाद आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. 'एकच मिशन जुनी पेन्शन', 'पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची'च्या घेषणांनी परिसर दणाणून टाकला. दरम्यान दुसऱ्या आठवड्यात या संपामुळे शासनाचे मोठे नुकसान होणार असून सर्वसामान्य नागरिकांचेही कामे अडल्याने त्यांनाही फटका बसणार आहे.

शनिवारी शासकीय कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढून आपल्या एकजुटीचा परिचय दिला. या मोर्चात विविध विभागातील हजारो शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन ‘एकच मिशन - जुनी पेन्शन’चा नारा बुलंद केला होता. राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. संविधान चौकात झालेल्या जाहीर सभेत मोर्चकऱ्यांनी समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार केला होता. तसेच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार साेमवार, २० मार्च रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यात तलाठी संघानेही कामबंद आंदोलन सुरू करत सहभाग नोंदवला. अवकाळी पावसाने शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आसवांचे तळे साठले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, संपात असलो तरी पंचनामे करणार अशी ग्वाही यावेळी आंदोलनकर्त्या तलाठ्यांनी दिली.

दरम्यान, २१ मार्च रोजी धरणे आंदोलन, २३ मार्च रोजी काळे झेंडे दाखविले जातील. २४ तारखेपासून ‘माझी पेन्शन-माझे कुटुंब’ हे अभियान राबविले जाणार आहे. एकीकडे संविधान चौकात विविध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले जात आहे. तर दुसरीकडे शासकीय कार्यालये ओस पडल्याने संपूर्ण शासकीय कामकाज ठप्प पडले आहे. हा आर्थिक वर्षाचा महिना आहे. विविध विकास कामांचे कोट्यवधींचे बिल अडून पडले आहेत. विविध विभागांचे बिल कोषागारात पडून आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या विविध दाखल्यांची कामे बंद पडली आहेत. त्यामुळे या मोर्चाबाबत तोडगा निघाला नाही तर या आठवड्यात शासनाचे मोठे नुकसान होणार आहे.

टॅग्स :StrikeसंपPensionनिवृत्ती वेतनEmployeeकर्मचारीGovernmentसरकारnagpurनागपूर