शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

स्वच्छ भारत मिशनचा नुसता बोलबाला; जिल्ह्यातील सव्वालाख कुटुंबाकडे शौचालयच नाही

By गणेश हुड | Updated: November 9, 2023 16:01 IST

उपलब्ध आकडेवारीचा विचार करता स्वच्छ भारत मिशनचा बोजवारा उडालेला दिसतो. 

नागपूर : देशातील ग्रामीण भागात स्वच्छतेची स्थिती व व्याप्ती लोकसहभागाच्या माध्यमातून वाढावी  हेतुने केंद्र शासनाव्दारे ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम राबविला जातो. याचा मोठा गाजावाजा सुरू आहे. परंतु नागपूर जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची आकडे बघता जिल्ह्यातील तब्बल १ लाख २३ हजार कुटुंबाकडे शौचालय नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आकडेवारीमुळे स्वच्छ भारत मिशनचा नुसता बोलबाला असून वास्तवात परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे. 

ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांत स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागाव्या, उघड्यावरील मलमूत्र विर्सजनाच्या पद्धतीला पूर्णपणे आळा बसावा, आरोग्य सुदृढ व संपन्नतेसह शाश्वत विकास करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. परंतु उपलब्ध आकडेवारीचा विचार करता स्वच्छ भारत मिशनचा बोजवारा उडालेला दिसतो. स्वच्छ भारत कार्यक्रमातील महत्वाचा  घटक

वैयक्तिक शौचालय : स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाचा हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत राज संस्थांमध्ये पायाभूत सर्वेक्षणानुसार शौचालयाची सुविधा उपलब्ध नसलेल्या सर्व ग्रामस्थांकडे सुविधा निर्माण करणे आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनान्वये सदरील मिशन कार्यक्रमामध्ये लाभार्थींना १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. असे असूनही एक लाखाहून अधिक कुटुंबाकडे शौचालय नसेल तर लोकांचे आरोग्य कसे राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जि.प.च्या वेबसाईटवर उपलब्ध  शौचालयाची आकडेवारी 

पंचायत समितींचे नाव - एकूण ग्रामपंचायत संख्या - कुटुंब संख्या शौचालय नसलेली कुटुंब संख्या - एकूण

  • भिवापूर    ५५    ५९६२        १४३३८
  • हिंगणा    ५३    १८७८१        २८११९
  • कळमेश्वर    ५१    १०४१२        १७७७६
  • कामठी    ४७    ११९६५        १७२२१
  • काटोल    ८३    १३४५१        २५२६३
  • कुही    ५९    ९९००        २१५९३
  • मौदा    ६२    १३९५३        २४४६३
  • नरखेड    ७०    १२४८१        २२७६३
  • नागपूर (ग्रा.)    ६८    १९८३०        २६८१६
  • पारशिवनी    ५१    ९७२२        १८३१५
  • रामटेक    ४५    १२५६६        २३१०८
  • सावनेर    ७५    १७४६८        २८२१८
  • उमरेड    ४७    ११५६९        २०६८९
  • एकूण    ७६६    १६८०६५        २९१०८२                                                                                                              
टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर