शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

नागपूरच्या ग्राहकांना गोड संत्र्याची मेजवानी  : दररोज २०० टेम्पोची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 22:51 IST

कळमना बाजारात मृग संत्र्याची आवक सुरू झाली असून ग्राहकांना रसाळ संत्र्याची मेजवानीच आहे. आवकीसोबतच दरही आटोक्यात आहेत. कळमन्यात दर्जा आणि आकारानुसार प्रति टन १५ ते २० हजार रुपये भाव आहेत.

ठळक मुद्दे दर्जा व आकारानुसार भाव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमना बाजारात मृग संत्र्याची आवक सुरू झाली असून ग्राहकांना रसाळ संत्र्याची मेजवानीच आहे. आवकीसोबतच दरही आटोक्यात आहेत. कळमन्यात दर्जा आणि आकारानुसार प्रति टन १५ ते २० हजार रुपये भाव आहेत. मध्यंतरी आलेला पाऊस आणि उन्हामुळे यंदा संत्र्याला चांगलाच बहार आला आहे. सध्या जवळपास दररोज २०० टन टेम्पो बाजारात येत असून विक्री वाढली आहे. पुढे आवक वाढण्याची शक्यता आहे.थेट बगिच्यातून संत्र्याची विक्रीमृग बहारात नागपुरी संत्र्याला मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक येथून प्रचंड मागणी असते. काही वर्षांपूर्वी काठमांडू, जम्मूलादेखील येथील संत्रा रवाना झाला होता. शेतकऱ्यांकडून कमिशन घेऊ नये, असे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे असल्याने अडतिया कमिशन व्यापाऱ्यांकडून घेतात. कमिशन टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडे धाव घेतली आहे. त्यांनी जानेवारीपासूनच बगिच्यातून खरेदी सुरू केली आहे. हजारो टन संत्र्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी सुरू आहे. वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनीही विक्री सुरू केली आहे. त्यामुळे कळमन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आवक कमी आहे. दररोज १५० ते १०० टेम्पोची आवक आहे. यंदा उत्पादन जास्त असल्याने भाव वाढले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पुढे आवक वाढेल, पण भाव वाढणार नाहीत, अशी माहिती फळ अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.नागपूर जिल्ह्यातून आवकमृग बहार संत्र्याची आवक काटोल, कोंढाळी, मोहपा, कळमेश्वर, सावनेर आणि लगतच्या परिसरातून सुरू आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी आहे. यावर्षी वातावरणाने चांगली साथ दिल्याने पिकाची प्रतवारी उत्तम आहे. कळमन्यातून संत्रा दक्षिण भारत, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यात पाठविला जातो. यावर्षीही या राज्यांमधून मागणी वाढली आहे. नागपुरी संत्र्याला संपूर्ण देशात मागणी असते. आवकीच्या तुलनेत विक्रीही चांगली असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.संत्रा गोड, गुणवत्ता चांगलीउत्पादक शेतकऱ्यांना महाऑरेंजतर्फे संत्र्याच्या गुणवत्तेबाबत नियमित प्रशिक्षण देण्यात येत असल्यामुळे मृग संत्रा गोड असून गुणवत्ताही चांगली आहे. यावर्षी विदर्भात ४ लाखांपेक्षा जास्त टन संत्र्याचे उत्पादन होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून भाव वाढले नाहीत. ग्राहकांना आकार आणि दर्जानुसार खरेदीची संधी आहे. ठोकच्या तुलनेत किरकोळ बाजारात भाव जास्त आहे. आंबियाच्या मृग बहार संत्र्याला जास्त मागणी असते.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हलnagpurनागपूर