शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

मराठा-कुणबी प्रमाणे भटक्या विमुक्तांची जनगणना करा; बेलदार समाज संघर्ष समितीचे मागासवर्ग आयोगाला निवेदन 

By मंगेश व्यवहारे | Published: January 29, 2024 12:12 PM

केंद्र सरकारने इदाते आयोगाच्या शिफारशीनुसार १८ ऑगस्ट २०२० रोजी पत्र पाठवून भटक्या विमुक्तांची स्वतंत्र जनगणना करण्याचे राज्य शासनाला कळविले होते.

नागपूर : राज्यात सुरु असलेल्या मराठा-कुणबी जनगणना सर्वेक्षणात भटक्या विमुक्तांची सुध्दा जनगणना करावी, अशी मागणी बेलदार समाज संघर्ष समितीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे केली आहे. रविभवन नागपूर येथे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ॲड. चंदालाल मेश्राम शासकीय दौऱ्यावर आले होते. त्यावेळी बेलदार समाज संघर्ष समितीतर्फे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र बढिये यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

केंद्र सरकारने इदाते आयोगाच्या शिफारशीनुसार १८ ऑगस्ट २०२० रोजी पत्र पाठवून भटक्या विमुक्तांची स्वतंत्र जनगणना करण्याचे राज्य शासनाला कळविले होते. मात्र यद्यापही भटक्या विमुक्तांची जनगणना करण्यात आली नाही. त्यामुळे मराठा-कुणबी जनगणना सर्वेक्षणासोबतच भटक्या विमुक्तांची जनगणना करण्याची मागणी त्यांनी केली.  यावर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ॲड. चंदालाल मेश्राम यांनी सांगितले की, भटक्या विमुक्तांच्या जनगणना सर्वेक्षणाचा अहवाल आयोगाने भारत सरकारला पाठवला पण भारत सरकारने त्यावर पैसे व काही उत्तर पाठवले नाही. त्यामुळे भटक्या विमुक्तांची जनगणना थांबली असल्याचे सांगितले.  समाज संघटनेसोबतच लोकप्रतिनिधींनी राज्य व केंद्र सरकारकडे त्यासंदर्भात पाठपुरावा करावा, असा सल्ला त्यांनी दिला.  याप्रसंगी बेलदार समाज संघर्ष समितीचे मिलिंद वानखेडे,  खिमेश बढिये,  मुकुंद अडेवार, प्रेमचंद राठोड, दिनेश गेटमे,  भिमराव शिंदे,  किशोर सायगन यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर