शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मतदारयादीतील गोंधळासाठी जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर महिन्याभरात कारवाई करा

By योगेश पांडे | Updated: July 4, 2024 17:05 IST

भाजपची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ३६ हजार मतदारांची नावे डिलिट कशी झाली ?

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूकीदरम्यान १.९४ लाखांहून अधिक मतदारांची नावे मतदारयादीतून गहाळ झाली व त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते. या मुद्द्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता विधानसभा निवडणूकीची तयारी सुरू होत असताना भारतीय जनता पक्षाने यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील आमदार व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. मतदारयादीतील गोंधळासाठी जबाबदार असलेल्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महिनाभरात कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मतदारयादीतील गोंधळामुळे मतदानाच्या दिवशी लाखो मतदारांना परत फिरावे लागले होते. तर ३३ हजार ४२४ मतदारांच्या नावासमोर डिलिटेडचा स्टॅंप होता. त्यांची नावे आपोआपच डिलीट करण्यात आली होती. तेदेखील मतदानापासून वंचित राहिले. निवडणूकीअगोदर प्रशासनाने मतदानवाढीच्या नावाखाली अनेक उपक्रम राबविले होते. मात्र मतदानाचा टक्का ५४.३० टक्के इतकाच राहिला. या मुद्द्यावरून भाजपने सुरुवातीपासूनच प्रशासनावर खापर फोडले होते. गुरुवारी शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. मतदार ओळखपत्र असूनदेखील सुमारे दोन लाख मतदारांना मतदान करता आले नाही. त्यांची नावे मतदारयादीतून गहाळ झाली होती. ती सर्व नावे परत मतदारयादीत सहभागी करण्यात यावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

३३ हजार नावे डिलिट कशी ?२७ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत २२.५६ लाख लोकांची नावे होती. मात्र ३३ हजर ४२४ नावांसमोर डिलिटेडचा स्टॅंप होता. ही सर्व नावे डिलिट कशी काय झाली असा सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करत त्यांना परत मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली. १४ जानेवारी २०२१ नंतर समाविष्ट झालेल्या मात्र मार्चच्या यादीतून वगळण्यात आलेल्या नावांचादेखील परत समावेश करावा अशी मागणी लावून धरली.

बीएलओ घरांपर्यंत पोहोचलेच नाही

बीएलओना घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेण्याचे काम दिले होते. मात्र अनेक बीएलओ मतदारांपर्यंत पोहोचलेच नाही असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूकीपर्यंत दर शनिवार-रविवारी विशेष शिबीराचे सर्व मतदान केंद्रांवर आयोजन करण्यात यावे अशी मागणीदेखील करण्यात आली.

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक 2024Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयnagpurनागपूर