शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

अंदमान एक्सप्रेस रोखल्याने रेल्वे स्थानकावर तणाव

By नरेश डोंगरे | Published: July 29, 2024 2:45 PM

किसान आंदोलनाचे कार्यकर्ते : जेवण न मिळाल्याने केला हंगामा

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिणेतून दिल्लीकडे निघालेल्या किसान आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर ट्रेन रोखली. सुमारे अर्धा ते पाऊण तास आक्रमकता दाखवत आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याने रेल्वेगाडीला विलंब झाला. परिणामी प्रवासीही संतप्त झाल्याने तणाव निर्माण झाला होता. शिर्षस्थ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची मागणी समजून घेत ती पूर्ण केल्यानंतर वातावरण निवळले.

दक्षिणेतील किसान आंदोलनाचे शेकडो कार्यकर्ते दोन दिवसांपूर्वी दिल्लीला होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. गाडीत त्यांच्या आंदोलक पवित्र्यामुळे त्यांना रविवारी नर्मदापूरममध्ये उतरून देण्यात आले. तेथे त्यांनी जोरदार हंगामा केल्याने नंतर त्यांना गाडी क्रमांक १६०३२ अंदमान एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. आज सकाळी १०.३० च्या सुमारास ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचली. येथे त्यांनी आपल्याला गाडीत जेवण न मिळाल्याची तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे पाहून आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी गाडीच्या इंजिनवर चढून, आडवे होऊन जोरदार घोषणाबाजी केली. 

सुमारे अर्धा ते पाऊणतास त्यांचे 'गाडी रोखो आंदोलन' सुरू होते. त्यांची रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी समजूत काढत होते. दुसरीकडे गाडीला विलंब होत असल्याने या गाडीतील प्रवासीही संतप्त झाले होते. तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनोफ्रेण्ड करून आंदोलकांची मागणी समजून घेतली. त्यांना लगेच जेवण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीnagpurनागपूरFarmerशेतकरी