शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दहशतवाद जिहादी असू शकत नाही

By admin | Published: December 27, 2015 3:16 AM

जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. धर्म संकटात असल्याचे सांगून दहशतवादी लोकांना संघटित करीत आहेत.

तारिक अन्वर यांचे ठाम मत : ‘जिहाद विरुद्ध दहशतवाद’ चर्चासत्रनागपूर : जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. धर्म संकटात असल्याचे सांगून दहशतवादी लोकांना संघटित करीत आहेत. दहशतवाद जिहादी असूच शकत नाही, असे ठाम मत आॅल इंडिया कौमी तंझिमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तारिक अन्वर यांनी येथे व्यक्त केले. आॅल इंडिया कौमी तंझिम (एआयक्यूटी) या संघटनेच्या विदर्भ विभागातर्फे ‘जिहाद विरुद्ध दहशतवाद’ या विषयावर सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे शनिवारी आयोजित चर्चासत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर मुख्य अतिथी म्हणून लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे, माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे राज्य सचिव अजय पाटील, आसरा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अजिज सोळंकी, चार्टर्ड अकाऊटंट डॉ. तेजिंदरसिंग रावल, आॅल इंडिया कौमी तंझिमचे महाराष्ट्रचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम, फादर संजय कोहचाडे आणि शब्बीर विद्रोही उपस्थित होते. तारिक अन्वर म्हणाले, देशात सत्तारूढ सरकारचे सूत्रधार नागपुरात असल्यामुळे या चर्चासत्राचा प्रारंभ नागपुरात केला. पुढे देशातील सर्व राज्यात चर्चासत्र घेण्यात येणार आहे. व्यक्तीच्या भावना धर्माशी जुळल्या असल्यामुळे त्याला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी धर्म हा सोपा मार्ग समजला जात आहे. हे चुकीचे आहे. यासाठी एकाने दुसऱ्या धर्माला समजून घेण्याची गरज आहे. खा. विजय दर्डा म्हणाले, योग्यतेपुढे धर्म येऊ नये. धर्माच्या नावावर लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘आर्म्स फॉर पीस’च्या गोष्टी करणारे व्यवसाय करीत आहेत. आम्हाला काय करायचे आहे, हे प्रारंभी निश्चित करावे. यावेळी दर्डा यांनी महिला शिक्षणावर भर दिला. शिक्षण व्यक्ती बदलू शकते. विकास व रचनात्मकतेचे उदाहरण देताना त्यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा उल्लेख केला. अखंडता कायम राखामुनाफ हकीम म्हणाले, एका-एका शब्दाबाबत भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देशाचे तुकडे करणाऱ्यांपासून सावध राहावे आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.दुफळी निर्माण करतो दहशतवाद इस्लामचे जाणकार मौलाना मुस्तफा रजा म्हणाले, गैरसमज शत्रुत्व निर्माण करते, तर शत्रुत्व दहशतवाद. अधिकाराचे रक्षण, अन्याय आणि दहशतवाद नष्ट करण्याचे काम जिहाद करते. जगातील अनेक संघटना मानवतेच्या शत्रू आहेत आणि जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ काढत आहे.ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे म्हणाले, हुसेन यांनी जे केले तो जिहाद होता. धर्मावर बोलणाऱ्या अनेकांना धर्माची फार कमी माहिती असते. दुसऱ्या धर्माची माहिती असायला हवी. डॉ. तेजिंदरसिंग रावल म्हणाले, शिखांनासुद्धा अशाच त्रास झाला होता. दहशतवादाला मुस्लीम सर्वाधिक बळी पडले आहेत. समाजात भीती निर्माण करणाऱ्यांचा धर्म केवळ दहशतवाद आहे. वरिष्ठ नेते शब्बीर विद्रोही म्हणाले, स्वातंत्र्यांपूर्वी इंग्रज क्रांतिकारकांना दहशतवादी समजायचे. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच क्रांतिकारांना देशभक्त समजले गेले. पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ) यांनी सांगितले आहे की, देशाप्रति प्रेम असणे, ही देशभक्ती आहे. आपल्यातील स्वार्थ आणि वाईट भावना दूर करण्याची लढाई म्हणजेच जिहाद आहे. संजय कोहचाडे म्हणाले, दहशतवादाच्या विरोधात प्रेमाचे हत्यार यशस्वी ठरले आहे. जगात दहशतवाद पसरविला जात आहे. तो जिहाद नाही. येशू मसिहाच्या संदेशाचे पालन केले तर हा विषयच राहणार नाही. यावेळी अनिल देशमुख आणि अजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. संचालन मो. आसीम अली यांनी केले. यावेळी ‘एआयक्यूटी’ विदर्भ सचिव मो. फझल पटेल, अमरावतीचे अब्दुल रफीक, वरोराचे शेख झहीरुद्दीन, यवतमाळचे मिर्झा वसीम बेग, अकोलाचे शेख वसीम, वर्धाचे इरफान बेग, नागपूरचे सलीम खान आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी)आॅल इंडिया कौमी तंझिम (एआयक्यूटी) या संघटनेच्या विदर्भ विभागातर्फे ‘जिहाद विरूद्ध दहशतवाद’ या विषयावर सिव्हिल लाईन्स येथील चिटणीस सेंटर येथे शनिवारी आयोजित चर्चासत्रात मौलाना मुस्तफा रजा यांच्या ‘आतंकवादी संघठन इस्लाम की कसोटीपर’ या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ‘एआयक्यूटी’चे अध्यक्ष खासदार तारिक अन्वर, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे, अनिल देशमुख, अजय पाटील, डॉ. अजिज सोळंकी, सीए डॉ. तेजिंदरसिंग रावल, मुनाफ हकीम, फादर संजय कोहचाडे, शब्बीर विद्रोही, मो. आसीम अली उपस्थित होते.