शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
4
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
5
किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
6
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
7
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
8
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
9
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
10
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
11
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
12
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
13
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
14
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
15
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
16
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
17
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
18
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
19
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
20
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले

ठाकरे एकत्र येतील तेव्हा येतील, आंबेडकरी पक्षांचे ऐक्य आवश्यक

By योगेश पांडे | Updated: April 21, 2025 15:21 IST

रामदास आठवले यांची भूमिका : उद्धव-राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडी तुटेल

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरी ऐक्याची भूमिका मांडली आहे. ठाकरे एकत्र येतील तेव्हा येतील, मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंबेडकरी पक्षांचे ऐक्य आवश्यक आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक पुढाकार घ्यावा असे आवाहन आठवले यांनी केले आहे. सोमवारी त्यांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करत विविध विषयांवर मत मांडले.

देशात केवळ दोनच पक्ष असावेत अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. मात्र आंबेडकरी पक्ष जास्त काळ एकत्रित राहू शकले नाहीत. आरपीआयमध्येदेखील फूट पडली व बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र आता आंबेडकरी ऐक्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व स्वीकारले तर सर्व आंबेडकरी पक्ष एकत्रित येऊ शकतात. माझा त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. मात्र आंबेडकरांकडून अद्याप हवी तशी साथ मिळालेली नाही. स्वबळावरच लढण्याची त्यांची भूमिका आहे. त्यांनी खरे तर बाबासाहेबांच्या विचारातून समोर आलेला पक्षच चालविला पाहिजे, असे आठवले म्हणाले.

तर महाविकासआघाडीतून उद्धव दूर होतीलउद्धव ठाकरेराज ठाकरे सोबत यावे अशी माझीदेखील इच्छा आहे. ते सोबत आले तर महाविकास आघाडीत निश्चित फूट पडेल. महाविकासआघाडी कधीही राज ठाकरे यांना सोबत घेणार नाही. त्याचा फटका मविआला बसेल. मात्र कुणीही एकत्रित आले तरी महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

बौद्धगयेसाठी पंतप्रधानांना भेटणारबौद्धगया येथील महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे. त्यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट १९४९ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी व्यापक आंदोलन सुरू आहे. याचा तोडगा निघावा यासाठी माझा प्रयत्न सुरू असून मी पंतप्रधानांना भेटणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.

आम्हाला मतदारसंघच तयार करता आले नाहीतमी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते व मलादेखील त्यामुळे सत्तेत राहता येते. माझा स्वभाव ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा नसल्यामुळे अनेकदा हक्काच्या गोष्टीदेखील आम्ही मिळवू शकत नाही. राजकीयदृष्ट्या पक्षाला हवी तशी मजबूती मिळाली नाही, कारण मतांच्या राजकारणात प्रभाव दाखवू शकलेलो नाही. पक्षासाठी समर्पित कार्यकर्ते असले तरी आम्हाला तगडे मतदारसंघ तयार करता आले नाही अशी खंत यावेळी आठवले यांनी बोलून दाखविली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवलेnagpurनागपूर