शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

‘कृषी अवजारे पुरवठा’ घोटाळा थंडबस्त्यातच

By आनंद डेकाटे | Published: July 08, 2024 7:19 PM

Nagpur : समाजकल्याण विभाग कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करतोय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजकल्याण विभागामार्फत महिला बचत गटांना कृषी अवजारे संच पुरवठा करण्यात आला होता. कृषी अवजारे बचत गटांच्या खात्यातून रक्कमही उचलण्यात आली होती. सदर प्रकरण चव्हाट्यावर येताच मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी चौकशी करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते; परंतु सध्या तरी या प्रकरणाची सखोल चौकशीच थंडबस्त्यात आहे. त्यामुळे विभाग या प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

समाजकल्याण विभागामार्फत २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचतगटांना कृषी अवजारे देण्याची योजना आखली. यासाठी खनिज प्रतिष्ठानमधून ८ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला. प्रत्येक महिला बचतगटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य देण्यात येणार होते. सर्व तालुक्यांतील महिला बचत गटांची यासाठी निवड करण्यात आली; परंतु उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्य मिळालेच नाही. याबाबतची तक्रार महिला बचत गटाने विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली. त्यांनी संबंधित तक्रार समाजकल्याण विभागाकडे वर्ग केली.

मिळालेल्या माहितीनुसार, साहित्य पुरवठा करण्याचे काम साई या कंपनीला देण्यात आले होते. हे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात आले. १० टक्के रक्कम भरल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात टाकण्यात आली. समाजकल्याण विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात आल्यानंतर ती लगेच काढण्यात आल्याची माहिती समोर आली. पुरवठादाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले; परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परत नेले. १० टक्के रक्कम त्रयस्थ व्यक्तीकडून भरण्यात आल्याची बाबही तपासात समोर आली. काही महिला बचत गटांचे प्रमाणपत्र संशयास्पद आहेत. काही प्रमाणपत्रांवर मागील एक-दोन वर्षांपूर्वीची तारीख आहे.

त्यामुळे बचत गट बोगस तयार करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. दोन ते तीन तालुक्यांच्या चौकशीतच ही बाब समोर आली. सर्व जिल्हाभर हा प्रकार झाल्याचा अंदाज आहे. गत काही महिन्यांपासून चौकशी थंडबस्त्यात असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :nagpurनागपूर