शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘जेपीसी’ची मागणी योग्यच; पण सर्वोच्च न्यायालयाची समितीही प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2023 21:20 IST

Nagpur News अदानीच्या मुद्द्याची चौकशी करण्यासाठी ‘जेपीसी’ गठित करण्याची मागणी योग्यच आहे. आमच्या पक्षानेही त्याचे समर्थन केले आहे; परंतु यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची समितीसुद्धा प्रभावी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

नागपूर : अदानीच्या मुद्द्याची चौकशी करण्यासाठी ‘जेपीसी’ गठित करण्याची मागणी योग्यच आहे. आमच्या पक्षानेही त्याचे समर्थन केले आहे; परंतु यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची समितीसुद्धा प्रभावी आहे. यात अधिकारी व तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समितीसुद्धा या प्रकरणाची सखोल चौकशी करू शकते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे सांगितले.

शनिवारी पवार यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या वक्तव्याबद्दल म्हणाले, यापूर्वीही अनेक नेत्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भाजपतर्फे गौरव यात्रा काढण्यात येत असल्याबाबत पवार म्हणाले, हा काही मोठा मुद्दा नाही. देशासमोर अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. लक्ष भरकटविण्यासाठी याला मुद्दा बनविण्यात आला आहे. पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समर्थन करीत त्यांच्या विचारात सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याचेही सांगितले. रत्नागिरी येथील आपल्या घरच्या मंदिरात त्यांनी वाल्मीकी समाजाच्या व्यक्तीला पुजारी म्हणून ठेवले होते. तर गाय ही किती उपयुक्त आहे, यावरही त्यांनी प्रकाश टाकल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आ. अनिल देशमुख, रमेश बंग उपस्थित होते. पवार यांनी यापूर्वी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

राजकारण्यांनी संयम पाळावा

छत्रपती संभाजीनगरात भडकलेल्या हिंसेबाबत शरद पवार म्हणाले की, जेव्हा धार्मिक विद्वेष पसरण्याची भीती असते तेव्हा राजकीय नेत्यांनी सावधगिरीने वक्तव्य करणे आवश्यक असते. त्यांनी राजकीय नेत्यांना संयम पाळण्याचा सल्लाही दिला. या घटनेचे स्वरूप जर धार्मिक आहे, तर ही चिंतेची बाब असल्याचे पवार म्हणाले.

विरोधी पक्षांच्या एकजुटीचा प्रयत्न, लवकरच बैठक

भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. यात अद्याप ठोस काही झालेले नाही. लवकरच विरोधी पक्षांची बैठक होईल. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ‘मिशन ४००’बाबत ते म्हणाले, ते प्रत्येक जागेवर दावा करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणुकीच्या तयारीत आहे; पण ही गोष्टी सार्वजनिक केली जात नाही.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार