शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

डाळी कडाडल्या; तूर डाळ १६५ रुपये किलो, ताटातून वरण गायब

By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 30, 2023 16:03 IST

स्टॉकिस्टांवर धाडी टाकण्याची मागणी, होऊ शकते निर्यात बंदी

नागपूर : भाजीपाला आणि इंधन दरवाढीने गृहिणींचे किचनचे बजेट बिघडलेले असून त्यात डाळींची भर पडली आहे. ऑगस्टमध्ये सर्वच डाळींच्या किमती कडाडल्या आहेत. श्रावण महिन्यात तूर डाळ दर्जानुसार १५० ते १६५ किलो तर उडीद, मूग या डाळींनी शंभरी गाठली आहे. दरवाढीमुळे खिशाला भुर्दंड बसत असल्याने नागरिकामध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने मोठ्या कंपन्यांवर धाडी टाकून स्टॉक बाहेर आणावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

दोन महिन्यात तूर डाळ २५ रुपयांची महाग

डाळींचे नवीन पीक फेब्रुवारी आणि मार्चमध्ये येणार आहे. तोपर्यंत स्वयंपाकघरात महाग डाळींचाच उपयोग करावा लागणार आहे. वरण असो वा अन्य पदार्थांमध्ये डाळींचा उपयोग होतो. पण आता महागड्या डाळींमुळे ताटातून वरण गायब झाले आहे. गेल्या दोन महिन्यात तूर डाळ २५, उडीद मोगर २० रुपये, मूग मोगर ३०, हरभरा डाळ २५ आणि मसूर डाळ ६ रुपयांनी महाग झाली आहे. सद्यस्थितीत डाळीचे दर कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. यंदा प्रारंभी मुसळधार पावसाने कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. केंद्र सरकारने डाळींवर निर्यात बंदी केली तरच दर कमी होतील, असे मत कळमना येथील होलसेल धान्य विक्रेते रमेश उमाटे यांनी व्यक्त केले. डाळींचे खरेदीदार ५० टक्के असल्याचे उमाटे यांनी सांगितले. 

डाळवर्गीय पिकांकडे वळला शेतकरी

केंद्र सकरारने हमीभाव वाढविल्याने शेतकरी डाळवर्गीय पीक लागवडीकडे वळला आहे. यंदा डाळी प्रचंड महाग होतील, एवढेही पीक कमी आलेले नाही. त्यानंतरही तूर आणि अन्य डाळींचे भाव का वाढत आहेत, हे एक आश्चर्यच आहे. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्याचे पीक घेतले जाते. राजस्थान व मध्य प्रदेशातून डाळींचा पुरवठा होतो. त्यानंतरही डाळी महागच आहेत. डाळीचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर कमी होण्याची चिन्हे नसल्याचे रमेश उमाटे यांनी सांगितले.

कंपन्यांकडे जास्त साठा, धाडी टाकाव्यात

मोठ्या कंपन्यांकडे लाखो टन साठा असल्याचा ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. सरकार मोठ्या कंपन्यांवर कारवाई करत नाही. त्याचा भुर्दंड सामान्यांवर बसत आहे. दर अचानक वाढल्याने ग्राहकांना डाळींसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. दर आवाक्यात आणण्यासाठी सरकारने तालुका आणि जिल्हास्तरावरील स्टॉकिस्टवर धाडी टाकाव्यात. अनेक दालमील मालकांनी भूमिगत टाक्यात तूरीचा साठा केल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त माल आहे. अतोनात नफा कमविण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे सामान्य पिचला जात आहे. सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन प्रत्येक दालमीलची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी गजानन पांडे यांनी केले आहे.

डाळी दोन महिन्यांपूर्वीचे भाव आताचे भाव (प्रतिकिलो)

तूर १२८-१४० १५०-१६५हरभरा ५३-५५ ७२-८०मसूर ७५-८० ८२-८६उडीद मोगर ९०-१२० १०८-१४०मूग मोगर ९०-९५ १०८-१२४

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर