शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावसानं रडवलं, पीक सडवलं; ३५.२२ लाख हेक्टर शेती पाण्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 09:49 IST

अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापसाला सर्वाधिक फटका 

सुनील चरपे  नागपूर : मुसळधार व अति मुसळधार पावसामुळे, तसेच पुरामुळे जून ते १७ ऑक्टाेबर या काळात राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३८ लाख ४४ हजार ८२६ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे ३५,२१,८६८.४९ हेक्टरमधील विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक हातचे गेल्याने शेतकरी  हेलावून गेला आहे. सर्वाधिक फटका कापूस व साेयाबीनच्या पिकाला बसला असून, फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांचेही माेठे नुकसान झाले आहे. जून ते ३१ ऑगस्ट या काळातील भरपाईसाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे ४,६३४.४६ काेटींची मागणी केली आहे. 

काही जिल्ह्यांत गाेगलगायींचा प्रादुर्भाव झाला हाेता. यात बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांसाेबत नागपूर व अमरावती जिल्ह्यांचाही समावेश आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करताना बीडच्या  १२,९५८ शेतकऱ्यांचे ३,८२२.३५ हेक्टर, लातूरमधील १,०८,६३६ शेतकऱ्यांचे ६८,३८५ हेक्टर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४०१ शेतकऱ्यांचे २८३.३३ हेक्टरमधील नुकसान झाल्याचे दाखविले आहे. बीड जिल्ह्यासाठी ५१९.८४ लाख, लातूरसाठी ९,३००.३६ लाख व उस्मानाबादसाठी ३८.६० लाखांची कृषी विभागाने मागणी केली. 

तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देशअतिवृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. सततच्या पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला असून, पावसामुळे मागील दोन ते तीन दिवसांत शेतीचे जे नुकसान झाले, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जून ते ऑगस्ट या काळातील नुकसानजून ते ३१ ऑगस्ट या काळात ३४ जिल्ह्यांमधील ३८,४४,८२६ शेतकऱ्यांचे ३१,७१,३३८.४९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. भरपाईसाठी ४,५३,५८८.८० लाखांची सरकारकडे मागणी केली आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे ३०,१६,४४२ शेतकऱ्यांच्या २६,२१,६९२.१६ हेक्टरमधील तर पावसामुळे ८,२८,३८४ शेतकऱ्यांच्या ५,४९,६४६.३३ हेक्टर पीक नुकसानीचा समावेश आहे. भरपाईसाठी ३,७८,०१९ लाख तर पावसाने झालेल्या भरपाईसाठी ७५,५६९.४३ लाखांची मागणी केली आहे.

सप्टेंबर व ऑक्टाेबरमधील नुकसान१ ते ३० सप्टेंबर काळात पावसामुळे १२ जिल्ह्यांमधील ५२ तालुक्यांतील २,३७,४३४ हेक्टरमधील तर १ ते १७ ऑक्टाेबर या काळात १६ जिल्ह्यांमधील ५२ तालुक्यांमधील १,१३,०९१ हेक्टरमधील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान कापूस, साेयाबीन, मका या पिकांसह संत्रा, माेसंबी व केळी या फळपिकांचे झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी