शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
2
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
3
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
4
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
5
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
6
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
7
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
8
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
9
एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
10
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
11
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
12
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
13
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
14
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
15
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
16
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
17
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
18
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
19
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

आंदोलनातील नायकांसाठी बुद्धिजीवींची भूमिका महत्त्वाची - ताराचंद्र खांडेकर 

By आनंद डेकाटे | Published: July 13, 2023 2:53 PM

स्मृतिशेष एल.आर. बाली यांना श्रद्धांजली

नागपूर : आंदोलनातील नायकांसाठी बुद्धिजीवींची भूमिका महत्त्वाची आहे. आंबेडकरी समाजातील बुद्धिजीवी हा सजग असला पाहिजे. त्याने आंदोलन व आंदोलनातील नायकाची दिशा निश्चित केली पाहिजे. आवळे बाबू, बरि. राजाभाऊ खोब्रागडे, एल. आर. बाली हे आंदोलनाचे बुद्धिजीवी नेता होते. एल. आर.बाली यांच्या जाण्याने मोठी सामाजिक हानी झाली असून संविधानिक मूल्य जोपासणारा समता सैनिक दलाचा समर्पित शिलेदार हरवला आहे, अशी भावना ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केली.

हिंदी मोरभवनच्या अर्पण सभागृहात स्मृतिशेष एल. आर. बाली यांच्या श्रध्दांजली सभेत ते बोलत होते. आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अण्ड लिटरेचर, समता सैनिक दल, रिपब्लिकन लोकप्रतिष्ठान यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम, हरिश चहांदे, रिपाइंचे नेते भूपेश थुलकर, नाटककार दादाकांत धनविजय यांनीही आपले विचार व्यक्त केले.

भदंत नागदीपंकर, डॉ. सविता कांबळे, डॉ. सुदेश भोवले, हरिश जानोरकर, डॉ. आर. डी. कोसे, चंद्रबोधी, पाटील यांनी श्रद्धांजलीपर शोक संवेदना व्यक्त केल्या. ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी एल. आर. बाली यांच्या कार्य कर्तुत्वाचा आढावा घेणारा पाठविलेला संदेश मच्छिंद्र चोरमारे यांनी वाचला.

- एल.आर. बाली आंबेडकरी चळवळीचे दीपस्तंभ

यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम म्हणाले, एल. आर. बालींच्या त्यागाचा आलेख नव्या पिढी समोर मांडला पाहिजे. बालींनी स्वकेंद्रीपणा कधीही स्वीकारला नाही. आंदोलनाला पुरक असणारं लेखन त्यांनी केले. आयुष्यभर निरपेक्ष जगलेले बाली हे आंबेडकरी चळवीचे दीपस्तंभ आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर