शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पळून आलेल्या दिल्लीतील मुलींचे खुद्द पोलीस अधीक्षकांनी केले समुपदेशन

By नरेश डोंगरे | Updated: December 28, 2024 23:10 IST

दिल्लीहून सुसाट निघाली चेन्नई एक्सप्रेस : नागपूर रेल्वे पोलिसांनी दाखविला रेड सिग्नल

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मनासारखे वागण्यासाठी पालकांकडून मोकळीक मिळत नसल्याने दिल्लीतील दोन मुलींनी थेट चेन्नई एक्सप्रेस धरली. बेभान अवस्थेत घर सोडून निघालेल्या या दोघींची माहिती कळताच त्यांना रेल्वे पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले. त्यानंतर रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांनी खुद्द या मुलींचे समुपदेशन करून त्यांचे भवितव्य सुरक्षित केले.सोना आणि मोना (नाव काल्पनिक, वय १५ वर्षे) या दोघी नॉर्थ दिल्लीतील नरेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्या दोघी वर्ग मैत्रीणी आहेत.

पालकांकडून  फिरायला जाऊ दिले जात नाही. कुणाशी बोलण्याची मोकळीक नाही आणि मोबाईलही वापरू दिला जात नाही. सततची शारिरिक आणि मानसिक कोंडी होत असल्याने या दोघी कंटाळल्या होत्या. तारुणाच्या उंबरठ्यावर आल्या असताना मनसारखे काहीच करू दिले जात नसल्याने त्यांनी घरच्यांकडून होणारी कोंडी फोडण्याचे प्रयत्न केले. त्यानुसार, संधी साधून शुक्रवारी सायंकाळी त्यांनी घर सोडले. रात्री या दोघी दिल्ली चेन्नई अशी तिकिट घेत तामिळनाडू एक्सप्रेसमध्ये बसल्या. दरम्यान, मुली गायब झाल्याचे लक्षात येताच दोन्हीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. चाैकशीत त्या तामिळनाडू एक्सप्रेसमध्ये बसल्याचे स्पष्ट होताच रेल्वे पोलिसांना तसा अलर्ट देण्यात आला. त्यांचे वर्णनही कळविण्यात आले. त्यामुळे सतर्क झालेल्या रेल्वे पोलिसांनी नजर रोखली. शनिवारी दुपारी १.१५ च्या सुमारास या दोघी प्रतिक्षालयात बसून दिसताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. नाव,गाव, पत्ता विचारल्यानंतर नॉर्थ दिल्लीतून पळून गेलेल्या त्या, या दोघीच असल्याचे स्पष्ट होताच रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे तेथे पोहचल्या. त्यांनी मुलींची वास्तपूस्त केली. कुठे जाणार, काय करणार, कशा करणार, याबाबत काहीच निश्चित नव्हते. समाजकंटकांच्या नजरेस या दोघी पडल्या असत्या तर त्यांचे आयुष्य बर्बाद झाले असते. हे त्या दोघींच्या लक्षात आणून देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पालकांना माहिती देऊन नागपूरला बोलवून घेण्यात आले. निरीक्षणगृहात रवानगीपालकांना येण्यास विलंब होणार याची जाणिव असल्यामुळे या दोघींना पाटणकर चाैकातील शासकीय निरीक्षण गृहात ठेवण्यात आले. त्या दोघींचे पालक येथे आल्यानंतर त्यांचेही समुपदेशन करून मुलींना ताब्यात दिले जाणार आहे. ही कामगरी जीआरपीचे एपीआय सुनील उईके, पीएसआय थॉमस, हवलदार संजय पटले, मजहर अली आणि ममता तिवारी यांनी बजावली.

टॅग्स :nagpurनागपूर