शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’; नागपूरकरांचा सण उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 18:58 IST

महिलांचे हळदी-कुंकू, पुरुषांचे ‘ओ... कोट’ जोरात : मंदिरातही रांगा.

निशांत वानखेडे, नागपूर : नवीन वर्षातील पहिला सण असलेला मकर संक्रांत नागपूरकरांनी उत्साहात व तेवढाच संयमात साजरा केला. ऊर्जा, उत्साह व समृद्धीचा सण मकर संक्रांतनिमित्त लोकांनी ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून वान वाटत, सुवासिनींच्या ओट्या भरून आनंद साजरा केला तर मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत पुरुषांनी जोशात पतंग उडवित ‘ओ... काट’ च्या आरोळ्यांनी आकाश निनादले. दरम्यान शहरातील विविध भागातील मंदिरातही दर्शनासाठी रांगा होत्या.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायण सुरू होते. त्यानिमित्त सूर्याची पूजा केली जाते. तांदूळ व काळ्या उळदाची खिचडी, काळ्या तीळापासून बनलेल्या वस्तू, तीळगुळ, लाेकरीचे कपडे, देशी तूप, तेल, शेंगदाणे, अन्न व धनदान केले जाते. देशभरात वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जाताे. आजूबाजूच्या महिलांनी एकत्रित येत हळदीकुंकू, तिळगुळाची देवाणघेवाण करीत एकमेकांना अभिवादन केले. आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना केली. महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीला हळदीकुंकू हा एक सामाजिक आणि सांस्कृतिक सण देखील मानला जातो. संक्रांतीपासून रात्रीचा अवधी कमी होऊन दिवस तीळ, तीळ वाढत जातो. थंडी कमी होते. त्यामुळे परस्परांना तीळगूळ देऊन स्नेहाचे बंधन दृढ करण्याचा हा सण नागपुरात उत्साहात साजरा झाला.

आकाशात काटाकाटीचे युद्ध

संक्रांत म्हणजे पतंग महोत्सवही असतो. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही आता संक्रांतीला पतंग उडविणे ही एक लोकप्रिय परंपरा झाली आहे. पतंगशौकिनांनी एक महिन्यापासून पतंग उडवायची तयारी केली होती. काहींनी घरीच पतंग व मांजा तयार केला होता, तर काहींनी रेडिमेडवर आपली हौस भागवली. सकाळपासून आकाशात पतंग दिसू लागले होते. दुपारनंतर पतंगांची गर्दी वाढून काटाकाटी सुरू झाली. काही ठिकाणी गच्चीवर सीडी प्लेअर लावून गाण्यांच्या साथीने पतंग उडवले जात होते. दिवसभर कापलेली व आकाशातून गिरक्या घेत पडणारी पतंग लुटण्यासाठी मुलांपासून थाेरामाेठ्यांचीही गल्लाेगल्लीत धावाधाव दिसून आली. जिकडे तिकडे ‘ओ... काेट’ च्या आराेळ्या ऐकू येत हाेत्या. विविध रंगछटांच्या, विविध आकारांच्या पतंगांचे युद्ध सायंकाळी उशिरापर्यंत रंगले होते.

मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

मकर संक्रातीला धार्मिक महत्त्वही आहे. सूर्य देवाची पूजा करण्यासह नागरिकांनी वेगवेगळ्या मंदिरातही दर्शनासाठी गर्दी केली हाेती. गणेश टेकडी, साई मंदिर, विठ्ठल मंदिर व इतर मंदिरांमध्ये लाेकांच्या रांगा लागल्या हाेत्या. यात महिलांची गर्दी अधिक होती. सुवासीनींनी आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना केली. निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच ईश्वराची प्रार्थना करून, आरोग्य, समृद्धी लाभावी यासाठी आशीर्वाद मागितला.

आता दिवस मोठा होईलमकर संक्रांतीला अध्यात्मिक महत्त्वासह शास्त्रीय महत्त्वही आहे. सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजे दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे सरकत जातो, ज्याला उत्तरायण देखील म्हटले जाते. मकर संक्रांतीपूर्वी रात्र मोठी असते व दिवस लहान असतो. या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात व पुढे दिवस तीळ तीळ वाढत जातो व थंडी कमी कमी होत जाते.

टॅग्स :nagpurनागपूर