शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

कायदा जगण्यातला अडसर ठरत असल्याने आदिवासी मुलाने मागितली इच्छामरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 10:19 PM

Nagpur News शेती असूनही ती विकण्याची सोय नसल्याने हा कायदा आपल्या जगण्यातील अडसर ठरत आहे. त्यामुळे आपणास इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी लिहीगाव येथील चैतू उईके यांचा मुलगा सेवक उईके या आदिवासी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देआदिवासी जमीन प्रतिबंधक कायदा ठरतोय जगण्यातील अडसर

नागपूर : आदिवासींची जमीन विक्री प्रतिबंधक कायदा आदिवासींच्या भल्यासाठी असला तरी सरकारने आदिवासींच्या अडचणींचा विचारच केला नाही. त्यामुळे शेती असूनही ती विकण्याची सोय नसल्याने हा कायदा आपल्या जगण्यातील अडसर ठरत आहे. त्यामुळे आपणास इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी कामठी तालुक्यातील लिहीगाव येथील चैतू उईके यांचा मुलगा सेवक उईके या आदिवासी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या उपजीविकेमध्ये आलेली अडचण मांडली. ते म्हणाले, आदिवासींच्या भल्यासाठीच सरकारने त्यांच्या शेतजमिनीला विक्रीकरिता प्रतिबंध घालणारा कायदा लागू केला. मात्र, जेथे शेती करणे शक्य नाही येथीलही शेती विकता येत नाही. पॉवर हाऊसच्या जवळ असलेली शेती करणे आता कठीण झाले आहे. त्यामध्ये उत्पन्न होत नसल्याने ती विकून दुसरी शेती खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करून परवानगी मागितली आहे. मात्र, काहीच फायदा झाला नाही. या काळात आपल्या मुलीचे दुर्धर ऑपरेशन झाले. त्यासाठी पैसा उभारता आला नाही. शेतीत उत्पन्न होत नसल्याने कुटुंबाची उपजीविका चालविणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीतही सरकार जमीन विकण्यासाठी परवानगी देत नसेल तर आपणास इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्यासारखीच अनेक शेतकऱ्यांचीही अडचण आहे. त्यांना मंत्रालयापर्यंत धाव घेणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक