शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

संयुक्त राष्ट्राने असमानतेचे धोरण सोडावे; कैलास सत्यार्थींचे परखड बोल

By योगेश पांडे | Published: March 20, 2023 8:55 PM

Nagpur News संयुक्त राष्ट्राने भेदभावाचे धोरण बाजूला सारत जास्त सर्वसमावेशक आणि गतिमान होण्याची गरज आहे. सोबतच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले.

 

नागपूर : सद्य:स्थितीत संपूर्ण जग हे एका संकटाच्या स्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्राची भूमिका महत्त्वाची ठरते. संयुक्त राष्ट्राने भेदभावाचे धोरण बाजूला सारत जास्त सर्वसमावेशक आणि गतिमान होण्याची गरज आहे. सोबतच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले. ‘जी-२०’अंतर्गत नागपुरात आयोजित ‘सी-२०’ समिटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

भारतात विविध प्रकारच्या शंभर समस्या असल्या तरी १० लाख उपायांचे माहेरघरदेखील हीच भूमी आहे. ‘सी-२०’चा गाभा हा अध्यात्माशी जुळला असून, याचे कुठल्याही धर्माशी काहीच घेणेदेणे नाही. ‘सी-२०’मधील प्रतिनिधी हे लोकशाहीचे वाहक आहेत. ‘एक जग, एक कुटुंब’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी मोठ्या राष्ट्रांनी आडमुठे धोरण सोडण्याची गरज आहे. ‘जी-७’ राष्ट्रांकडून गरीब व अविकसित देशांना कोरोनानंतर मदत व्हावी, यासाठी ११ ट्रिलीयन डॉलर्सचा निधी उभारण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात गरजू, गरीब देशांना यातील अवघा ०.१३ टक्के निधीच देण्यात आला. जगातील देशांनी त्यांच्या सैन्यावरील १० दिवसांचा खर्च कमी केला असता तर याहून अधिक निधी गोळा झाला असता. ‘एक जग, एक कुटुंब’ असे नारे देत असताना जगात सुरू असलेला हा आर्थिक, राजकीय अन्याय दूर व्हायला हवा. अशा स्थितीत जगाच्या नजरा भारताकडे आहेत. दया आणि करुणेचा दृष्टिकोन असलेल्या भारताने ग्लोबलायझेशनचे नेतृत्व करायला हवे, असे आवाहन यावेळी सत्यार्थी यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक