शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

बसेसच नाहीत; परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शाळेतच मुक्काम करावा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 7:10 AM

Nagpur News महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नसल्याने ग्रामीण भागातील ७० टक्के बससेवा ठप्प आहे. अशात बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असल्याने बाहेरगावच्या केंद्रावर परीक्षेसाठी जाणारे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही चिंतेत आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागातील ७० टक्के बससेवा ठप्पपालक, विद्यार्थ्यांपुढे पेच

मंगेश व्यवहारे

नागपूर : एस.टी. महामंडळाची बससेवा ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची एकमेव सुविधा आहे. परंतु, अजूनही महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नसल्याने ग्रामीण भागातील ७० टक्के बससेवा ठप्प आहे. अशात बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असल्याने बाहेरगावच्या केंद्रावर परीक्षेसाठी जाणारे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही चिंतेत आहेत. आम्हाला आता परीक्षेसाठी शाळेतच मुक्काम करावा लागणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

सध्या शाळांमध्ये बोर्डाच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. प्रॅक्टिकल व सराव परीक्षा घेण्यात येत आहेत. प्रवासाची सुविधा नसल्याने सराव परीक्षेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घट झाली आहे.

- माझ्या गावातून शाळा ही १५ ते १६ किलोमीटर पडते. आमच्यासाठी एस.टी. ही एकमेव साधन आहे. परीक्षेच्या काळात बस उपलब्ध नसेल, तर परीक्षेच्या कालावधीत शाळेच्या परिसरातच थांबावे लागणार आहे.

आरती मस्के, विद्यार्थिनी

- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बसेस नसल्यामुळे चांगलीच अडचण होत आहे. परीक्षेच्या काळात खऱ्याअर्थाने सरकारने परीक्षा सेवा बसेस सुरू करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थितीही खूप नाजूक असल्याने विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क बससेवा सुरू कराव्यात.

- युवराज शंकरपुरे, मुख्याध्यापक, उदय विद्यालय, देवलापार

 

- बस हे एकमेव साधन विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी आहे. येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा लक्षात घेऊन, लवकरात लवकर बससेवा सुरू करण्याची गरज आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे गरजेचे आहे. बससेवा सुरू नसल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू शकतात.

मुरलीधर मानकर, वामनराव मानकर हायस्कूल, खामली, ता. काटोल

- परीक्षेच्या काळात एस.टी. सुरू न झाल्यास हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. शासनाने या विषयाकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. लवकरात लवकर बससेवा सुरू करण्यासंदर्भात महामंडळाला निवेदन देणार आहोत.

अनिल गोतमारे, जिल्हाध्यक्ष, वि. मा. शि. संघ, नागपूर जिल्हा

- एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे बहुतांश कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे रुजू झालेले कर्मचारी आणि लाईन चेकिंगवरील कर्मचारी अशा मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ग्रामीण भागात ३० टक्के बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. संप कर्मचाऱ्यांनी मागे घेतल्यानंतर ग्रामीण भागातील उर्वरित सेवा सुरू करण्यात येईल.

नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ, नागपूर विभाग

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रroad transportरस्ते वाहतूक