शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

हातात हात घालून लढण्याची गरज

By admin | Published: February 12, 2017 2:24 AM

आज झेंडा कुणाच्या हाती आहे. कोण पुढे आहे, आणि कोण मागे. या सर्व गोष्टी विसरून प्रत्येकाने एकदुसऱ्याच्या हातात हात घालून एकजूट

भारतीय महिला फेडरेशनची सभा : स्मिता पानसरे यांचे प्रतिपादन नागपूर : आज झेंडा कुणाच्या हाती आहे. कोण पुढे आहे, आणि कोण मागे. या सर्व गोष्टी विसरून प्रत्येकाने एकदुसऱ्याच्या हातात हात घालून एकजूट होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा स्मिता पानसरे यांनी केले. भारतीय महिला फेडरेशनच्यावतीने ‘आजच्या परिस्थितीमध्ये स्त्री शक्तीच्या आंदोलनाची दशा व दिशा’ या विषयावर शनिवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. आमदार निवासाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय महिला फेडरेशनच्या राष्ट्रीय सचिव अ‍ॅनी राजा, राज्य सचिव लता भिसे, नूरजी व गार्गी चक्रवर्ती उपस्थित होत्या. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते भारतीय महिला फेडरेशन या संघटनेसाठी आयुष्यभर झटणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार करण्यात आला. पानसरे पुढे म्हणाल्या, सध्या विरोधक उघडपणे वार करू लागले आहे. त्यामुळे आम्हाला सावध झाले पाहिजे. आम्हाला समाज परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी लढाई सुरू आहे. मात्र सोबतच समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, हेही ओळखण्याची गरज आहे. समाजात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशातील इतिहास आणि अभ्यासक्रम बदलविला जात आहे. केंद्र सरकार एखाद्या गारुड्याप्रमाणे नवनवीन खेळ करीत आहे. अशा लोकांना पुरोगामी विचारांची भीती वाटत होती, म्हणून पुरोगामी विचारांच्या लोकांचे जाणीवपूर्वक खून केले असाही त्यांनी आरोप केला. संघटनेच्या राष्ट्रीय सचिव अ‍ॅनी राजा यांनी अशा कार्यक्रमातून भविष्यासाठी ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले. तसेच गार्गी चक्रवर्ती यांनी मार्गदर्शन करताना आज आम्ही आमच्या संविधानाचे रक्षण करीत आहे, की नाही, अशी मनात भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन उषा मिश्रा यांनी केले तर रंजना महाजन-काळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)