शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

धान्याचे एकही पोते खराब झाले नाही

By admin | Published: November 16, 2014 12:46 AM

‘एफसीआय’च्या (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) गोदामांत जागा नसल्याने बाहेर ठेवलेल्या धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. परंतु २०१३-१४ या वर्षात सर्व धान्य गोदामातच

२०१३-१४ वर्षाची आकडेवारी : ‘एफसीआय’ प्रशासनाचा दावानागपूर : ‘एफसीआय’च्या (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) गोदामांत जागा नसल्याने बाहेर ठेवलेल्या धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. परंतु २०१३-१४ या वर्षात सर्व धान्य गोदामातच ठेवण्यात आले असून एकही पोते धान्य खराब झाले नसल्याचा दावा ‘एफसीआय’च्या जिल्हा कार्यालयाकडून करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकाराच्या विवरणात ही माहिती देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २०१० ते २०१२ या कालावधीत हजारो पोती गहू व तांदूळ गोदामाबाहेर ठेवण्यात आला होता. अशा स्थितीत ‘एफसीआय’च्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.१ डिसेंबर २०१३ ते ३० आॅगस्ट २०१४ या कालावधीत ‘एफसीआय’च्या नागपूर येथील जिल्हा कार्यालयात किती धान्य साठविण्यात आले, हे धान्य कोणत्या प्रकारचे होते आणि त्याची किंमत काय होती, किती धान्य गोदामाबाहेर ठेवण्यात आले व उंदीर-घुशींमुळे किती धान्य खराब झाले यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. यावर ‘एफसीआय’कडून सविस्तर उत्तर देण्यात आले. ‘एफसीआय’ अजनी येथे धान्य साठविण्यासाठी मोठी २१ तर ५ लहान गोदामं आहेत. १ जानेवारी १३ रोजी येथे ४३,१७३.४३० मेट्रिक टन गहू तर २०७७२.२४७ मेट्रिक टन तांदळाचा साठा होता. ३० आॅगस्ट २०१४ रोजी हाच साठा अनुक्रमे ३४,२४४.७१२ मेट्रिक टन व २६,८७०.४२३ मेट्रिक टन इतका होता. २०१३-१४ या कालावधीत गव्हाची किंमत १,७४० रुपये प्रति क्विंटल तर तांदळाचे दर २,५१० रुपये प्रति क्विंटल इतके असल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान, या कालावधीत धान्याचे एकही पोते गोदामाबाहेर ठेवण्यात आले नाही व कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही असे ‘एफसीआय’तर्फे सांगण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २०१२-१३ या कालावधीत तर गहू-तांदळाची हजारो पोती गोदामाबाहेर होती. तरीदेखील धान्य अजिबात खराब झाले नव्हते असा दावा ‘एफसीआय’ने केला होता. (प्रतिनिधी)