शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

वीज नाही तर पाणीही नाही

By admin | Published: June 19, 2017 2:13 AM

नवेगाव- खैरी, कन्हान व जुना गोरेवाडा यासह पाच जलशुद्धीकरण केंद्रांचा वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने

नागरिक त्रस्त : ४५ दिवसात १६ वेळा वीज पुरवठा खंडित लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवेगाव- खैरी, कन्हान व जुना गोरेवाडा यासह पाच जलशुद्धीकरण केंद्रांचा वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागपूर शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच काही भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.गेल्या ४५ दिवसात जलशुद्धीकरण केंद्रांचा १६ वेळा वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे ४१.२५ तास पंपिंग बंग राहिले. वीज पुरवठा खंडित झाल्याने विस्कळीत झालेला पाणीपुरवठा वीज पूर्ववत आल्यानंतरही सुरळीत होण्यासाठी बराच वेळ लागतो. तसेच यामुळे पंपिंगचे नुकसान होते. २४० एमएलडी क्षमतेच्या कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचा ४९ वेळा वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे १८.१५ तास पंपिंग बाधित होते. १३६ एमएलडी क्षमतेच्या पेंच-१ जलशुद्धीकरण केंद्राचा ११ वेळा , १४५ एमएलडी क्षमतेच्या पेंच-२ केंद्रात ५ वेळा, १२० एमएलडी क्षमतेच्या पेंच-३ केंद्रात ८ वेळा तर १६ एमएलडी क्षमतेच्या गोरेवाडा केंद्रात १४ वेळा वीज पुरवठा बांधित झाला. नवेगाव- खैरी पंपिंग स्टेशन आणि गोरेवाडा केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराच्या पश्चिम, मध्य, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण नागपूरच्या काही भागाचा पाणी पुरवठा बाधित झाला होता. कन्हान केंद्रात वीज पुरवठा बाधित झाल्यास पूर्ण,उत्तर आणि दक्षिणच्या काही भागाचा पाणीपुरवठा बाधित राहिला. वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने जलवाहिनीत हवा शिरते. ती बाहेर काढण्यासाठी बराच कालावधी लागतो. तसेच जलवाहिनीत दूषित पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो. जलशुद्धीकरण केंद्रांचा थोडावेळ वीज पुरवठा खंडित झाला तरी यामुळे जलकुंभांची पाण्याची पातळी कमी होते. याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. पाच मिनिटे वीज पुरवठा खंडित झाला तरी पंपिंग सुरू होऊ न जलवाहिनीत अपेक्षित जलप्रवाह येण्यासाठी अडीच तासाचा कालावधी लागतो. दुसरीकडे वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने टँकरची मागणी वाढते. नागरिकांनी अशा प्रसंगी सहकार्य करावे, असे आवाहन आॅरेज सिटी वॉटर यांनी केले आहे.