शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

नियतकालिकांच्या कागद, छपाई, वितरणावर नाममात्र कर असावा

By निशांत वानखेडे | Updated: December 28, 2024 19:18 IST

ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके : साहित्य अकादेमी आणि वि. सा. संघाचा परिसंवाद

नागपूर : नियतकालिके ही अभिव्यक्तीचे प्रभावी साधन असून सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. परंतु नियतकालिके अधिक व्यापक होण्यासाठी आणि अधिकाधिक वाचकांपर्यंत नियमितपणे पोचण्यासाठी त्यांच्या कागद, छपाई, वितरणावर नाममात्र कर असावा, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.

साहित्य अकादेमी आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘मराठीतील वाङ्मयीन आणि वैचारिक नियतकालिके’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. वि. सा. संघाच्या अमेय दालनात आयाेजित परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, साहित्य अकादेमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रमोद मुनघाटे, क्षेत्रीय कार्यालय मुंबईचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश नागर व युगवाणीचे संपादक प्रफुल्ल शिलेदार उपस्थित होते.

डहाके पुढे म्हणाले की सरकारी अनुदान हे बरेचदा तुटपुंजे असते, त्यातून वास्तविक खर्च निघत नाही. त्यामुळे दानकर्ता, प्रायोजक आणि प्रेक्षकांवर आर्थिक नियोजनाचा भार पडतो. याशिवाय सरकारी अनुदानात सरकारचा हस्तक्षेप नसावा याकडे त्यांनी लक्ष वेधले. जवळ जवळ १८०० च्या काळापासून निघालेल्या नियतकालिकांचा आढावा घेत साहित्य संघाच्या युगवाणीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ऑनलाईन नियतकालिके, पारंपरिक ते ऑनलाईन रूपांतर, त्याचा वाचक वर्ग आणि त्याची शाश्वतता यावर देखील त्यांनी चर्चा केली. रूपरेखा ओमप्रकाश नागर, तर प्रास्ताविक प्रफुल्ल शिलेदार यांनी केले.

मास्तरांना गुंतविले, ग्रंथालय संपले, वाचक कसे हाेतील : गवसपरिसंवादाच्या समाराेपीय सत्रात प्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी सरकारच्या धाेरणावर प्रश्न उपस्थित केले. मास्तरांना वेगवेगळ्या कामात गुंतविले, शाळेतील ग्रंथालये संपली आहेत, अशावेळी विद्यार्थी दशेतून वाचक कसे तयार हाेतील, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला. देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना गवस म्हणाले, काेणत्याही विचारधारेच्या लाेकांनी एकमेकांचे पटत नसले तरी एका मंचावर वैचारिक चर्चा घडवावी. वैचारिक अस्पृश्यता अतिशय अयोग्य आहे. संवादाने विचार विकसित होतात म्हणून वाद-प्रतिवादाला नियतकालिकांत जागा हवी. आज ती नसल्याने लवकर भावना दुखावण्याचा काळ आला व निखळ निकोपता लयाला गेली, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

दोन अभ्यासपूर्ण सत्रे

परिसंवादाच्या निमित्ताने ‘साहित्यिक नियतकालिके’ व ‘वैचारिक नियतकालिके’ अशा दोन अभ्यासपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमाेद मुनघाटे यांच्या अध्यक्षतेत साहित्यिक नियतकालिके हे सत्र झाले. यात गणेश सातपुते यांनी देशातील नियतकालिकांचा इतिहास उलगडला. आसाराम लोमटे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना वाचन संस्कृती व गंभीर वाचक नाहीत, ही टीका अयाेग्य असल्याचे म्हटले. नवीन पिढीमध्ये जाणून घेण्याची जिज्ञासा आहे पण ती त्यांच्या मार्गाने पाेहचवावी लागेल, अशी भावना व्यक्त केली. राजेंद्र डाेळके यांच्या अध्यक्षतेत वैचारिक नियतकालिके हे सत्र झाले. यात सहभागी झालेल्या अरुणा सबाने यांनी सामाजिक चेतना व नियतमालिके आणि रुविंद्र रुक्मणी पंढरीनाथ यांनी ‘राजकीय जाणीवा आणि नियतकालिके’ या विषयावर विचार व्यक्त केले.

टॅग्स :nagpurनागपूर