शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

यंदा राज्यात साेयाबीनऐवजी कपाशीचा ‘भाेंगा’ वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 7:00 AM

Nagpur News सन २०२१-२२ च्या हंगामात कापसाला किमान ८ हजार रुपये, तर कमाल १४,३०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने यावर्षी राज्यातील कपाशीचे लागवड क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत २.४६ लाख हेक्टरने वाढले आहे.

ठळक मुद्देमागील वर्षीच्या तुलनेत २.४६ लाख हेक्टरने क्षेत्र वाढले हंगाम ताेंडावर असल्याने शेतकऱ्यांची लगबग

सुनील चरपे

नागपूर : खरीप हंगाम ताेंडावर असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. मात्र, बियाणे व खतांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये सध्यातरी गर्दी वाढलेली दिसत नाही. सन २०२१-२२ च्या हंगामात कापसाला किमान ८ हजार रुपये, तर कमाल १४,३०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने यावर्षी राज्यातील कपाशीचे लागवड क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत २.४६ लाख हेक्टरने वाढले आहे.

साेयाबीनला ६,३०० ते ७,९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असला तरी काही भागात राेग व किडींमुळे साेयाबीनच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने साेयाबीनच्या पेरणीक्षेत्रात १.५५ लाख हेक्टरची घट हाेणार असल्याचा अंदाज राज्याच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी बियाणे व खतांच्या किमतीसाेबतच वापर व मागणीत वाढ झाली असून, राज्यात खते व सर्व पिकांच्या बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

रासायनिक खतांची मागणी व पुरवठा

महाराष्ट्राला सन २०२२-२३ च्या खरीप हंगामासाठी ५७.३५ लाख मेट्रिक टन युरियासह सर्व संयुक्त व मिश्र खतांची आवश्यकता आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे ५२ लाख मेट्रिक टन खतांची २८ फेब्रुवारी २०२२ राेजी मागणी केली आहे. केंद्र सरकारने यातील ४५.२० लाख मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. ही सर्व खते टप्प्या-टप्प्याने राज्याला पुरविण्यात येणार आहेत. १२.१५ लाख मेट्रिक टन खतांचा शिल्लक साठाही राज्याकडे उपलब्ध आहे.

बियाण्यांची आवश्यकता

सन २०२२ च्या खरीप हंगामासाठी अन्नधान्याच्या १४६.८५ हेक्टरमधील विविध पिकांच्या १७.९५ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून, १९.८८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. ही गरज महाबीजच्या १.७२ लाख क्विंटल, नॅशनल सीड काॅर्पाेरेशनच्या ०.१५ क्विंटल आणि खासगी कंपन्यांनी उत्पादन केलेल्या १८.०१ लाख क्विंटल बियाण्यांनी पूर्ण केली जाणार आहे.

साेयाबीन बियाण्यांची उपलब्धता

साेयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्याच्या कृषी विभागाने ‘घरचे साेयाबीन बियाणे माेहीम कार्यक्रम राबविला हाेता. या कार्यक्रमांतर्गत सन २०२२ च्या प्रस्तावित ४६ लाख हेक्टरसाठी ३४.५० लाख क्विंटल बियाणे प्रस्तावित केले हाेते. या बीजाेत्पादन कार्यक्रमांतर्गत ४ लाख १३ हजार ८०० निवडक शेतकऱ्यांकडील ४५,०९,७४६ क्विंटल साेयाबीन बियाणे राखून ठेवण्यात आले आहे.

खतांचे लिंकिंग व शेतकऱ्यांची लूट

डीएपी आणि युरियाची माेठी मागणी आहे. शेतकऱ्यांची ही निकड लक्षात घेता बहुतांश कृषी सेवा केंद्र मालक इतर खतांचा खप हाेण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खतांसाेबत दुसरी खते, बियाणे अथवा मायक्राे न्युट्रिएन्ट खरेदी करण्याची सक्ती करतात. गरज असल्याने शेतकरी याला बळी पडतात. या खते, बियाणे लिंकिंगच्या प्रकारात शेतकऱ्यांची आर्थिक लूट हाेते.

टॅग्स :cottonकापूस