शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

यंदाही सूर्य आग ओकणार, उन्हाळा अधिक ‘ताप’दायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2022 10:57 AM

यावर्षी एप्रिल व मे महिन्यात जवळपास १५ दिवस ४३ ते ४४ अंशावर राहील. चार ते पाच दिवस ४६ अंशावर पाेहोचेल तर मेच्या दाेन-तीन दिवस ४७ अंशावर पाेहोचण्याची शक्यता आहे. रात्रीचे किमान तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याचीही शक्यता आहे.

ठळक मुद्देसरासरीत किंचित वाढ : विदर्भ सर्वाधिक तापेल, दाेनदा ‘हीट वेव्हज’

निशांत वानखेडे

नागपूर : यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असण्याची चिन्हे आहेत. यंदा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याचे तापमान सरासरीपेक्षा ०.९ ते १ अंशाने वाढेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

हा तापमानवाढीचा ट्रेंड २००१ पासून सुरू झाला. भौगोलिक परिस्थितीनुसार यंदाही विदर्भात सूर्याचा प्रकाेप अधिक जाणवेल. काही जिल्ह्यांत साधारणत: मे महिन्यात दाेनदा उष्ण लहरी (हीट वेव्हज) येण्याची शक्यता आहे.

हवामान विभागातर्फे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत तापमानाचा अंदाज मांडण्यात आला आहे. या अंदाजानुसार मार्च महिन्यात राज्यातील दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असणार. तीन महिन्यांत ते सरासरीएवढे राहील. मे महिना अधिक तापलेला असेल. रात्रीच्या किमान तापमानातही अधिक वाढ हाेण्याची शक्यता आहे. दाेन-तीन वर्षांच्या तुलनेत मागील वर्षी कमी तापमानाची नाेंद झाली. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला हाेता. यंदा अवकाळी पाऊस कमी हाेण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

विदर्भाला ‘भाैगाेलिक’ ताप

विदर्भात सरासरी ४४ अंश तापमानाची नाेंद हाेते. गेल्या वर्षी चार ते पाच दिवस ४५ अंशावर पाेहोचले हाेते. यंदा मात्र तापमानात वाढ जाणवेल. यावर्षी एप्रिल व मे महिन्यात जवळपास १५ दिवस ४३ ते ४४ अंशावर राहील. चार ते पाच दिवस ४६ अंशावर पाेहोचेल तर मेच्या दाेन-तीन दिवस ४७ अंशावर पाेहोचण्याची शक्यता आहे. रात्रीचे किमान तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याचीही शक्यता आहे.

- नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात एक दिवस दिवसाचे तापमान ४८ अंशावर जाण्याचा अंदाज आहे.

- साधारणत: २५ एप्रिल ते २५ मेपर्यंत चार ते पाच दिवस चालतील, अशा दाेन उष्ण लहरींची शक्यता आहे.

- वर्धा, अमरावती व अकाेल्यात कमाल तापमान किंचित वाढलेले असेल. भंडारा, गाेंदिया, गडचिराेली, यवतमाळमध्ये तापमान सरासरी एवढे राहील.

- भाैगाेलिक परिस्थितीमुळे मे महिन्यात विदर्भात सूर्य डाेक्यावर आलेला असताे. २० ते ३० मे दरम्यानचा हा काळ असताे. ताे नवतपा म्हणूनही ओळखला जाताे. शिवाय संपूर्ण विदर्भात राजस्थान, गुजरातकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचाही परिणाम हाेताे.

१९९० पासून आतापर्यंत तापमानात सरासरीपेक्षा १ अंशाची वाढ झाली आहे. २०३० ते २०५० पर्यंत त्यात २ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. वाढ राेखली नाही तर गंभीर परिणाम जीवसृष्टीला भाेगावे लागतील. साधारणत: २००१ पासून हवामान बदलाचे परिणाम प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. त्यामुळे दरवर्षी तापमान वाढीचे रेकार्ड माेडत जातील. पावसाचे दिवस वाढले व ताे आकलन व नियंत्रणाबाहेर जात आहे.

- सुरेश चाेपणे, हवामान तज्ज्ञ.

टॅग्स :environmentपर्यावरणVidarbhaविदर्भnagpurनागपूर