शहरं
Join us  
Trending Stories
1
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
2
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
3
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
4
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
5
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
6
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
7
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव
8
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
9
T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
11
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
12
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
13
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
14
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
15
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
16
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
17
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
18
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
19
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
20
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या

महाविद्यालयांच्या हलगर्जीचा हजारो विद्यार्थ्यांना फटका

By admin | Published: September 11, 2015 3:29 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांची ‘आॅनलाईन’ नोंदणी खोळंबली असल्याची बाब समोर आली आहे.

नागपूर विद्यापीठ : अनेक जणांची ‘आॅनलाईन’ नोंदणी खोळंबलीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांची ‘आॅनलाईन’ नोंदणी खोळंबली असल्याची बाब समोर आली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे महाविद्यालये आपली जबाबदारी झटकत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विद्यापीठाने नोंदणीला मुदतवाढ दिली असली तरी, संबंधित महाविद्यालये तसेच विभागांवर कुठलीही कारवाई केलेली नाही.‘एमकेसीएल’सोबत करार झाल्यानंतर विद्यापीठाने परत ‘ई-सुविधा’ सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासोबत ‘आॅनलाईन’ नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. प्रवेशाची अंतिम तारीख २ सप्टेंबर ही होती. या मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज जमा केले. यानंतर महाविद्यालय व विभागांतील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या अर्जांची ‘आॅनलाईन’ नोंदणी करायची होती. नियमानुसार हे काम विद्यार्थ्यांचे नसून विभाग किंवा महाविद्यालयांतील संबंधित कर्मचाऱ्यांचेच आहे. परंतु अर्ज जमा झाल्यानंतर अनेक महाविद्यालये व शैक्षणिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांनाच ‘आॅनलाईन’ नोंदणी करण्यासाठी सांगण्यात येत आहे. कर्मचारी जास्त कामापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांवर ‘आॅनलाईन’ नोंदणी करवून घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. विद्यापीठाच्या काही शैक्षणिक विभागांतदेखील असेच चित्र आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये तर ‘आॅनलाईन’ नोंदणीची सोयदेखील नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जवळपासच्या ‘नेटकॅफे’मधून अर्ज भरावा लागत आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा फायदा उचलत ‘नेटकॅफे’ चालकांकडून अर्जामागे ५० ते १०० रुपये घेण्यात येत आहेत.(प्रतिनिधी)महाविद्यालयांना उशिरा आली जागशहरातील काही महाविद्यालयांना तर ‘आॅनलाईन’ नोंदणीसंदर्भात उशिरा जाग आली. नोंदणीला काही दिवस शिल्लक असताना विद्यार्थ्यांशी संपर्क करण्यास सुरुवात झाली. अनेक विद्यार्थ्यांना फोनच न लागल्यामुळे प्राध्यापकांची धावाधाव होत असल्याचे चित्र आहे. शिवाय महाविद्यालयांत ‘आॅनलाईन’ नोंदणीची व्यवस्था नसल्यामुळे जास्त वेळ थांबून बाहेरूनच नोंदणी करावी लागत आहे.महाविद्यालयांची भूमिका अयोग्यनियमांनुसार संबंधित महाविद्यालय व विभागांनाच ‘आॅनलाईन’ नोंदणी करायची आहे. यात विद्यार्थ्यांना भुर्दंड बसत असेल तर ही अयोग्य बाब आहे. यासंदर्भात महाविद्यालयांच्या प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद द्यावी, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी केले.