शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये विजांचे तांडव, तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 5:39 PM

Nagpur News नरखेड तालुक्यात शनिवारी झालेल्या विजांच्या तांडवात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याशिवाय शिवारात बांधून असलेली बैलजोडी जागीच ठार झाली.

ठळक मुद्दे हिवरमठ, मुक्तापूर येथील घटना

 

नागपूर : नरखेड तालुक्यात शनिवारी झालेल्या विजांच्या तांडवात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याशिवाय शिवारात बांधून असलेली बैलजोडी जागीच ठार झाली. शनिवारी दुपारी १.३० ते २ वाजताच्या दरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या.योगेश रमेश पाठे (वय २७, रा. हिवरमठ), दिनेश ज्ञानेश्वर कामडी (३४), बाबाराव मुकाजी इंगळे (६०, दोघेही रा. मुक्तापूर) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

हिवरमठ शिवारात दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास योगेश पाठे हा तरुण शेतात पेरणी करत असताना पाऊस सुरू झाला. त्यामुळे योगेश हा घरी जाण्यासाठी रस्त्यावर असलेल्या मोटारसायकलजवळ पोहोचला असता अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. योगेशचे १० दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, तो मोठा भाऊ व आईसोबत राहत होता. त्याच्याकडे पाच एकर शेती आहे.

मुक्तापूर शिवारात शेतातील झोपडीत बसून असलेल्या दोन शेतकऱ्यांचा झोपडीवर वीज पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने दिनेश कामडी, बाबाराव इंगळे हे शेतात असलेल्या झोपडीत बसले होते. विजेचा कडकडाट सुरू असताना वीज झोपडीवर पडल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दिनेशचे पाच महिन्यापूर्वी लग्न झाले होते.

दिनेश घरी का आली नाही म्हणून त्याचे वडील शेतात पाहायला गेले असता दोघेही त्यांना झोपडीत मृतावस्थेत आढळले. त्यांनी ही माहिती गावातील नागरिकांना दिली असता दोघांचाही वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे लक्षात आले. नरखेड पंचायत समितीच्या सभापती नीलिमा सतीश रेवतकर यांनी यासंदर्भात तहसीलदार डी. जी. जाधव यांना माहिती देत संबंधितांना त्वरित मदत मिळण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

पिंपळगाव येथे बैलजोडी ठारतालुक्यातील पिंपळगाव (राऊत) शिवारात भिष्णूर येथील शेतकरी सुनील तानबाजी कळंबे यांच्या शेतात दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून बैलजोडी जागीच ठार झाली

टॅग्स :Deathमृत्यू