शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

साहित्य महामंडळावर विदर्भाचे तीन नवे प्रतिनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 11:17 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीमध्ये विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी म्हणून विलास मानेकर, अकोल्याचे डॉ. गजानन नारे आणि वर्धा येथील प्रदीप दाते यांची नियुक्ती क रण्यात आली आहे.

ठळक मुद्देविलास मानेकर, प्रदीप दाते, गजानन नारे यांची वर्णी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीमध्ये विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी म्हणून विलास मानेकर, अकोल्याचे डॉ. गजानन नारे आणि वर्धा येथील प्रदीप दाते यांची नियुक्ती क रण्यात आली आहे. रविवारी वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.वि.सा. संघाच्या रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नव्या प्रतिनिधींची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी साहित्य संघाच्या विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. साहित्य महामंडळाचा विदर्भातील तीन वर्षाचा कार्यकाळ ३१ मार्चला पूर्ण झाला. सोबत महामंडळावर असलेल्या विदर्भाच्या पूर्वीच्या प्रतिनिधींचा कार्यकाळही संपला आहे.१ एप्रिलपासून महामंडळाचे कार्यालय औरंगाबाद येथे मराठवाड्याच्या संस्थेकडे राहणार आहे. याबाबत माहिती देताना म्हैसाळकर यांनी सांगितले की, या तीन पदाधिकाऱ्यांची निवड यापूर्वीच करण्यात आली होती. रविवारी झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महामंडळातर्फे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनापासून महामंडळाच्या बैठका, धोरणात्मक निर्णय आणि विविध उपक्रमांमध्ये विदर्भ संघाची भूमिका मांडण्यात या तीन प्रतिनिधींची महत्त्वाची जबाबदारी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विलास मानेकर हे सध्या वि.सा. संघाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी पाच वर्षे कोषाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे. साहित्य संघाच्या विविध कार्यात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.डॉ. गजानन नारे हे वि.सा. संघाच्या अकोला शाखेचे अध्यक्ष आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून विदर्भाच्या कार्यकारिणीचे सभासद आहेत. त्यांच्याच पुढाकाराने २०१७-१८ मध्ये बाल साहित्य संमेलनाचे देखणे आणि यशस्वी आयोजन अकोला येथे करण्यात आले होते. विदर्भ संघाच्या कार्यात सक्रिय सभासद म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे डॉ. नारे यांनी मुलांच्या सर्वांगिण विकासाचे उद्देश ठेवून अकोला येथे प्रभात किड्स डे बोर्डिंग स्कूलची स्थापना केली. अत्यंत कमी खर्चात सीबीएससी अभ्यासक्रमासह मुलांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करता यावे अशी व्यवस्था त्यांनी निर्माण केली असून आज या शाळेमध्ये ४५०० च्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांची सर्वत्र चर्चा केली जाते.महामंडळाच्या कार्यात त्यांची सक्रियता निश्चितच प्रभावी ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे. महामंडळावर वर्णी लागलेले तिसरे प्रतिनिधी प्रदीप दाते हे वर्धा शाखेचे सचिव आणि गेल्या १० वर्षांपासून वि.सा. संघाच्या कार्यकारिणीचे सक्रिय सभासद आहेत. विदर्भाच्या शाखा समन्वय समितीचे ते निमंत्रक असून ६५ शाखांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.शाखांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणे, साहित्यिकांच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजनात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. यापूर्वी पुण्याला महामंडळ असताना कार्यकारिणीचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे.

टॅग्स :literatureसाहित्य