शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

एकाच कुटुंबातील तीन जण विहिरीत पडले; मानकापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 2:55 PM

घराजवळच्या विहिरीजवळची जमिन अचानक खाली गेल्यामुळे २ वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले.

ठळक मुद्दे घराजवळच्या विहिरीजवळची जमिन अचानक खाली गेल्यामुळे २ वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले.आज सकाळी ११.१५ च्या सुमारास मानकापूरच्या गायत्रीनगरात ही घटना घडली.चौघांना बाहेर काढण्यात आले. पण मुलाला विहिरीतून बाहेर काढणाचे प्रयत्न सुरू आहेत. 

नागपूर, दि.31- घराजवळच्या विहिरीजवळची जमिन अचानक खाली गेल्यामुळे २ वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे विहिरीत अडकून पडले. आज सकाळी ११.१५ च्या सुमारास मानकापूरच्या गायत्रीनगरात ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौघांना बाहेर काढण्यात आले. पण मुलाला विहिरीतून बाहेर काढणाचे प्रयत्न सुरू आहेत. 

गायत्रीनगर झिंगाबाई टाकळीत राजेश कुंभारे यांचे घर आहे. तेथे दीड वर्षांपासून सुधीर चौधरी यांचा परिवार भाड्याने राहतो. घराच्या अंगणात विहिर आहे.  सुधीर यांची पत्नी सुरेखा, सुरेखांच्या मावशी मंदाताई महाजन (वय ६०) आणि दोन वर्षांचा चिमुकला अंकुश या विहिरीजवळ बसून होते. जमीन पावसामुळे भुसभुशीत झाली असल्यामुळे अचानक ही जमीन खाली गेली. त्यामुळे अंगणात (विहिरीच्या बाजुला) गप्पा करीत असलेल्या  सुरेखा, मंदाताई आणि अंकुश विहिरीत पडले. मोठा आवाज आल्यामुळे घरात बसलेले सुधीर चौधरी आणि त्यांचे वडील यादवराव चौधरी (वय ७०) धावले. त्यांना पोहणे येत असल्यामुळे त्यांनी सुरेखा आणि मंदाताई यांना बाहेर काढले. चिमुकला अंकूश मात्र त्यांच्या हाती लागला नाही. विहिरीच्या आजुबाजूची जमिन पोकळ असल्यामुळे अंकूशला शोधण्याच्या प्रयत्नात सुधीर आणि त्यांचे वडीलही चिखलात फसले. दरम्यान, आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. कर्णोपकर्णी वा-यासारखी या घटनेची माहिती परिसरात पसरली. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली. मोठ्या संख्येत नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना बोलविले.   अग्निशमन दलाचा ताफा आणि मानकापूर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी बचाव कार्य सुरू केले.  दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर सुनील चौधरी व त्यांच्या वडिलांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी, सुरेखा आणि मंदाताई यांनाही बाहेर काढण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. दरम्यान, चिमुकल्या अंकुशचा शोध घेणे सुरू होते. त्याला बाहेर काढण्यासाठी मोठमोठे पंप लावून संपूर्ण पाणी बाहेर फेकण्यात आले. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने मलबाही बाहेर फेकण्यात आला. मात्र, अंकुश हाती लागला नव्हता. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.