शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

‘अँटी इन्कम्बन्सी’ तपासून तिकीट कापणार; लोकसभेच्या निकालावरून भाजपने घेतला धडा

By योगेश पांडे | Updated: August 13, 2024 14:41 IST

संघासमोर मांडली स्पष्ट भूमिका

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाला लागलेल्या भाजपकडून महायुतीला काहीही करून सत्तेत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लोकसभेत उमेदवार निवडीत चूक झाल्याचा फटका पक्षाला बसला होता. त्यातून धडा घेत भाजपने विधानसभेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्या आमदारांविरोधात जनतेतून ‘अँटी इन्कम्बन्सी’चा सूर असेल त्यांचे तिकीट कापण्यात येणार आहे. या मुद्द्याची चाचपणी करण्याचे पक्षाचे हे धोरण निश्चित मानण्यात येत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोरदेखील हीच भूमिका मांडण्यात आली आहे.

मागील आठवड्यात नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत संघाचे सहसरकार्यवाह अरुण कुमार हेदेखील होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत फडणवीस यांनी लोकसभेतील पराभव व विधानसभेतील नियोजनाबाबत संघधुरिणांना माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत अनेकांविरोधात जनतेत रोष होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून काहीजणांना तिकीट देण्यात आले. त्यांचा पराभव झाला.

उमेदवाराची प्रतिमादेखील महत्त्वाची

निवडणुकीच्या राजकारणात पक्षासोबतच उमेदवाराची प्रतिमादेखील महत्त्वाची असते. कितीही राष्ट्रीय व प्रादेशिक मुद्दे असले तरी स्थानिक मुद्यांमुळे निकाल बदलू शकतो. लोकसभेत हे दिसून आले. बदलत्या राजकारणात उमेदवाराच्या अवतीभोवतीच निवडणूक फिरते, या फडणवीस यांच्या शब्दांतूनच भाजपच्या पुढील दिशेचे संकेत मिळाले. ज्या आमदारांबाबत जनतेत जास्त नाराजीचा सूर असेल त्यांचे तिकीट कापण्यात येण्याचीच दाट शक्यता आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा