शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

वाघाचे रखवालदार उपाशी !

By admin | Published: May 16, 2016 3:16 AM

पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे (एसटीपीएफ) जवान रात्रंदिवस वाघाच्या संरक्षणात जंगलात पहारा देत आहेत्.

पेंच व्याघ्र प्रकल्प : ‘एसटीपीएफ’ चे पगार थांबलेनागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे (एसटीपीएफ) जवान रात्रंदिवस वाघाच्या संरक्षणात जंगलात पहारा देत आहेत्. मात्र या जवानांना मागील तीन महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व जवानांना जंगलात २४ तास तैनात करण्यात आले आहे. असे असताना वन विभागाने त्यांच्या भोजनाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे त्यांना स्वत:च्या भोजनाची स्वत:च व्यवस्था करावी लागते. मात्र तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने पोट कसे भरावे,अशा चिंतेत सापडले आहे. शिवाय उपाशीपोटी ही फौज वाघाची सुरक्षा कशी करणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. शिकाऱ्यांपासून वाघांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) च्या पुढाकारातून वन विभागाने मागील चार वर्षांपूर्वी नागपूरसह संपूर्ण राज्यात या एनटीपीएफ जवानांची विशेष भरती केली आहे. त्यानुसार सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात एकूण ७६ एसटीपीएफ जवान तैनात आहेत. त्यामध्ये ५४ तरुण आणि २२ तरुणींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या जवानांचे पगार वेळेवर न होणे, ही नेहमीच समस्या बनली आहे. मागील वर्षी सुद्धा या जवानांच्या पगाराची अशीच समस्या निर्माण झाली होती. वनविभाग वेळोवेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे (एनटीसीए) बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आले आहे. या सर्व जवानांचे तीन महिन्यांपासून पगार थांबल्याने त्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. या एसटीपीएफ फौजेतील बहुतांश तरुण गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासोबतच वन विभागाने या सर्व जवानांच्या प्रवास भत्त्याचे बिले मागील चार वर्षांपासून रोखून ठेवले असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय दुसरीकडे वन विभागातील इतर वनरक्षकांचे मात्र दोन महिन्यापूर्वीच प्रवासभत्ता बिले मिळाली आहे. तसेच ताडोबा येथील एसटीपीएफ जवानांना सुद्धा प्रवासभत्ता बिले देण्यात आली असल्याची माहिती आहे. असे असताना आमच्यावरच अन्याय का, असा पेंचमधील सर्व जवानांनी प्रश्न उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)