शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

कांद्यासोबत आता टोमॅटोही होऊ लागलेत लाल; आवक कमी; भाव वाढले

By मोरेश्वर मानापुरे | Published: November 19, 2023 8:32 PM

दिवाळीनंतर टोमॅटोचे दर १० ते २० रुपयांदरम्यान असल्याचा सामान्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे.

नागपूर : दिवाळीनंतर टोमॅटोचे दर १० ते २० रुपयांदरम्यान असल्याचा सामान्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे. पण यावर्षी पावसामुळे स्थानिक उत्पादकांचे टोमॅटोचे पीक खराब झाले. सध्या नागपूर जिल्हा वगळता महाराष्ट्राचा अन्य भाग आणि आंध्रप्रदेश, कर्नाटकमधून टोमॅटो विक्रीसाठी नागपुरात येत आहेत. पुरवठ्याच्या तुलनेत आवक कमी असल्याने किरकोळमध्ये भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. वाढत्या भावामुळे कांद्यासोबत आता टोमॅटोही लाल होऊ लागले आहेत.

दरवर्षी नोव्हेंबरमध्ये असते स्थानिकांकडून आवक

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात स्थानिकांकडून आणि लगतच्या जिल्ह्यातून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक असते. त्यामुळे भाव कमीच असतात. टोमॅटोची शेतातून तोडणी करून बाजारात विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांना वाहतुकीचा दरही परवडत नाही. एवढे दर पडले असतात. याच कारणामुळे शेतकरी हिवाळ्यात बऱ्याचदा टोमॅटो रस्त्यावर फेकतात. अशी स्थिती यंदा नाही. मात्र, मुसळधार पावसामुळे टोमॅटो खराब झाले आहेत. पुरवठ्याच्या तुलनेत आवक कमीच आहे. सध्या संगमनेर, मदनपल्ली (आंध्र) आणि बेंगळुरू येथून टोमॅटो विक्रीसाठी येत आहे. ठोक बाजारात दर्जानुसार किलो भाव २५ ते ३० रुपये आहे. किरकोळमध्ये ५० ते ६० रुपये दराने विक्री होत आहे. नागपुरात दररोज २५ ट्रकची आवक आहेत. याउलट भाज्यांचे दर कमी आहेत. फूल कोबी ३०, पत्ता कोबी २० आणि वांगे १० रुपये किलो आहेत.

दीड महिन्यांपासून कांद्याचे भाव स्थिर

कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष गौरव हरडे म्हणाले, कळमन्यात दररोज दक्षिण भारत, महाराष्ट्राच्या औरंगाबाद, नगर, सोलापूर या भागातून १८ ते २० ट्रकची आवक आहे. गुजरातेतून पांढऱ्या कांद्याचे दोन ट्रक विक्रीसाठी येत आहेत. कळमना ठोक बाजारात दर्जानुसार लाल कांदे ४० ते ५० रुपये आणि पांढऱ्या कांद्याचे दर ५० ते ६० रुपये किलो आहेत. हे दर गेल्या दीड महिन्यांपासून स्थिर आहेत. मध्यंतरी ६० ते ७० रुपये किलोवर गेलेले दर सध्या कमी झाले आहेत. राज्याच्या धुळे आणि अन्य भागातून कांद्याची आवक वाढल्यानंतच भाव कमी होतील.

आवक वाढल्यानंतर भाव होतील कमी

विक्रेते भावेश वसानी म्हणाले, नवीन कांदे ४० ते ५० रुपये आणि जुन्या कांद्याचे भाव कमीच आहे. जुन्या कांद्याला मागणी कमी आहे. जुन्या कांद्यामुळे भाववाढीवर नियंत्रण असून नवीन कांद्याचे भाव वाढू देत नाही. मध्यंतरी ६० ते ७० रूपयांपर्यंत वाढलेले भाव सध्या ४० ते ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. पुढे आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील.