शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

राज्यातील वृक्षलागवड मोहीम यंदाही उद्दिष्टाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:07 AM

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना अस्तित्वात आणली. त्यात पाच वर्षांसाठी ५० कोटी ...

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना अस्तित्वात आणली. त्यात पाच वर्षांसाठी ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविले असले, तरी यंदाही ही योजना उद्दिष्टाविनाच राबविली जात आहे. कोरोना संक्रमणामुळे सलग दोन वर्षांपासून ही योजना दुर्लक्षित झाली आहे.

भाजप-सेना युतीच्या काळामध्ये २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीची योजना राबविण्यात आली होती. त्याची उद्दिष्टपूर्ती करून गिनीज बुकमध्येही नोंद झाली होती. त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी २०२० ते २०२४ या काळात ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना राबविण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी वर्षाला १० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट २०२० मध्ये झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले होते. मात्र, पुढील घटनाक्रमात राठोड यांचे मंत्रिपद गेले. कोरोनामुळे योजना प्रभावित झाली. यंदा तर वृक्षलागवडीचे उद्दिष्टच आखून देण्यात आलेले नाही. असे असले तरी नियमित योजनांच्या माध्यमातून वृक्षलागवडीचे काम जिल्ह्यात सुरू आहे.

...

सामाजिक वनीकरण आघाडीवर

जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेमध्ये यंदा नागपूर विभाग सामाजिक वनीकरण आघाडीवर आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या जिल्ह्यात १३ ठिकाणी १९ नर्सरी असून, यातून १ लाख ३० हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. सर्व रोपवाटिकांमध्ये २० ते २५ प्रजातींची झाले उपलब्ध असून, या आठवड्यापर्यंत एक लाख तीन हजार रोपट्यांची लागवड सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ग्रापमंचायतींनाही दरवर्षी साडेसात ते आठ लाख रोपांचा पुरवठा विभागाकडून केला जातो, अशी माहिती विभागीय वन अधिकारी गीता नन्नावरे यांनी दिली आहे.

...

नागपूर वनविभागाकडून २० हजार वृक्षलागवड

नागपूर वन परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक भरतसिंग हाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मोहिमेत आतापर्यंत २० हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे. वन विभागाच्या १५ नर्सरींमध्ये ८ लाख रोपे असून, १८ महिन्यांवरील २ लाख, तर ९ महिन्यांवरील ६ लाख रोपे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

...

शेतात बांधावर वृक्षलागवड अनुदान योजनाही सध्या बंद अवस्थेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडून अनुदानच आलेले नाही. संसर्गजन्य महामारीत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कित्येकांना प्राणास मुकावे लागले.