शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

दादासाहेब दीक्षाभूमीचे खरे शिल्पकार

By admin | Published: August 13, 2015 3:44 AM

दिवंगत रा.सू. गवई यांचे कर्तृत्व व प्रयत्नामुळेच आज दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहू शकले.

रा.सू. गवई यांना आदरांजली : नितीन गडकरी यांचे प्रतिपादननागपूर : दिवंगत रा.सू. गवई यांचे कर्तृत्व व प्रयत्नामुळेच आज दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहू शकले. त्यामुळे दिवंगत रा.सू. गवई हेच दीक्षाभूमीचे खरे शिल्पकार म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. बिहार व केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी आपली आदरांजली व्यक्त करतांना ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले अध्यक्षस्थानी होते तर बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, महापौर प्रवीण दटके, माजी खासदार व ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, पीरिपाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई, न्यायमूर्ती भूषण गवई, आ. नाना श्यामकुळे, बसपाचे मुरलीधर मेश्राम, माकपाचे अजय शाहू प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, दादासाहेब गवई यांचे व्यक्तिमत्त्व हे विलक्षण होते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. बिहारचे राज्यपाल असतांना त्यांनी तेथील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात मोलाचे कार्य केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात सदानंद फुलझेले यांनी दिवंगत दादासाहेब गवई यांच्यामुळेच दीक्षाभूमीवरील जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहू शकल्याचे सांगितले. याप्रसंगी महापौर प्रवीण दटके, दत्ता मेघे, प्रा. जोगेंद्र कवाडे, अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, डॉ. नितीन राऊत, रमेश बंग, अजय शाहू यांनीही दिवंगत रा.सू. गवई यांच्या आठवणींना उजाळा देत आपली आदरांजली व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या आदरांजलीचे वाचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी केले. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात सुरुवातीला सर्वांना बुद्ध वंदना ग्रहण केली. प्रास्ताविक आ. नाना श्यामकुळे यांनी केले. संचालन विलास गजघाटे यांनी केले. (प्रतिनिधी)रिपब्लिकन ऐक्याचे आवाहनदिवंगत रा.सू. गवई यांनी रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे पुन्हा रिपाइंचे ऐक्य व्हावे, असे आवाहन नितीन गडकरी यांच्यासह डॉ. नितीन राऊत, सुलेखा कुंभारे, प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. तसेच यावेळी दत्ता मेघे यांनी दीक्षाभूमीवर दिवंगत रा.सू. गवई यांचा पुतळा उभारण्याची विनंती केली. नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात दिवंगत गवई यांचे स्मारक किंवा पुतळा उभारण्यासंबंधी सर्वांनी मिळून निर्णय घ्यावा. यात केंद्र व राज्य सरकार नेहमीच सहकार्य करेल. परंतु त्यात कुठलाही वाद होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी विनंती सुद्धा केली.