शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्वत:च्या घरासारखेच नागपूर शहर सुरक्षित करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 20:50 IST

स्वत:चे घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जसा प्रयत्न करते अगदी त्याचप्रमाणे मी नागपूर शहराला सुरक्षित बनविण्याचा प्रयत्न करेन, असा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि नागपूर प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने प्रेस क्लबच्या सभागृहात ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते, त्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचा मनोदय : ‘मिट द प्रेस’मध्ये मनमोकळ्या गप्पा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:चे घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जसा प्रयत्न करते अगदी त्याचप्रमाणे मी नागपूर शहराला सुरक्षित बनविण्याचा प्रयत्न करेन, असा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि नागपूर प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने प्रेस क्लबच्या सभागृहात ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते, त्यात ते बोलत होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र आणि प्रेस क्लबचे सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांनी प्रारंभी डॉ. उपाध्याय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर यांनी मिट द प्रेसची संकल्पना सांगितली.नागपूर शहराच्या सुरक्षेसंबंधाने पोलीस आयुक्त म्हणून आपली जबाबदारी तसेच कल्पना सांगताना डॉ. उपाध्याय यांनी भाष्य केले. पब्लिक ओरिएंटेड पुलिसिंगवर आपण भर देणार आहोत. पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येकाला येथे दिलासा मिळेल, अशी व्यवस्था करण्याचे आपण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.शहरातील गुन्हेगारीवर बोलताना त्यांनी इतर महानगराच्या तुलनेत येथील गंभीर गुन्हे कमी असल्याचे म्हटले. गुन्हेगारी आणखी कमी करण्यासाठी शहरातील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. बालगुन्हेगारी हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. कायद्याप्रमाणे त्यावर ज्या उपाययोजना करायच्या त्या करूच मात्र एनजीओच्या मदतीने समुपदेशन आणि जनजागृती करून हा मुद्दा हाताळण्याचा प्रयत्न करू. बालगुन्हेगारीच्या संबंधाने प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र अधिकारी नेमू, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले. आर्थिक गुन्हे झपाट्याने वाढत आहेत, पीडितांना त्यांची रक्कम परत मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असता या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी ईओडब्ल्यू हा स्वतंत्र सेल आहे. मात्र, केवळ तपासाने समस्या सुटणार नाही. आर्थिक फसवणुकीचे गुन्हे घडूच नये, यासाठी सतर्कता तसेच जनजागरण होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.महिला - मुली तसेच बालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. नशेच्या आहारी चाललेली तरुणाई, बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारी मंडळी तसेच विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था यासंबंधाने अनेक प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले.हे माझे शहर आहे, येथील पोलीस माझे पोलीस आहेत आणि मी येथे सुरक्षीत आहे, ही भावना नागरिकांमध्ये रुजविण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. आपल्या कार्यकाळात आपण हे करू शकलो, तर ती आपली आयुष्याची कमाई राहिल, असेही शेवटी डॉ. उपाध्याय म्हणाले.

 

टॅग्स :Bhushan Kumarभुषण कुमारpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय