शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो... : मजरुह व कैफी आझमी यांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:37 IST

उर्दू साहित्य जगतामध्ये उत्कृष्ट शायर म्हणून मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या रचनांमधून त्यांनी साहित्य, समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या दोन्ही शायरांनी गीतकार म्हणूनही हिंदी सिनेमाची कारकीर्द गाजविली आहे. कैफींचे ‘कर चले हम फिदा...’ व मजरुह यांचे ‘वक्त ने किया क्या हंसी सितम...’ हे गीत देशभक्तीने ओतप्रोत आणि समाजाला आरसा दाखविणारे होते. या दोन महान शायरांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या गीतांची मैफिल श्रोत्यांसाठी सजली.

ठळक मुद्देसिद्धीविनायक पब्लिसिटीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उर्दू साहित्य जगतामध्ये उत्कृष्ट शायर म्हणून मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या रचनांमधून त्यांनी साहित्य, समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या दोन्ही शायरांनी गीतकार म्हणूनही हिंदी सिनेमाची कारकीर्द गाजविली आहे. कैफींचे ‘कर चले हम फिदा...’ व मजरुह यांचे ‘वक्त ने किया क्या हंसी सितम...’ हे गीत देशभक्तीने ओतप्रोत आणि समाजाला आरसा दाखविणारे होते. या दोन महान शायरांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या गीतांची मैफिल श्रोत्यांसाठी सजली.श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीच्या ‘डायमंड फॉरेव्हर’ या संगीत उपक्रमात रविवारी मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांना स्वरांजली वाहण्यात आली. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना श्री सिद्धीविनायकचे समीर पंडित यांची होती. सागर मधुमटके, अरविंद पाटील, सारंग जोशी, सोनाली दीक्षित आणि श्रेया खराबे या आघाडीच्या गायकांनी ही स्वरांची मैफिल सजविली. सोनाली यांनी ‘वक्त ने किया क्या हंसी सितम...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. पुढे सारंग यांनी ‘तुम इतना जो मुस्कुरा रही हो..., ये नयन डरे डरे...’, पाटील यांच्या ‘तारो मे सजके..., एक दिन बिक जायेगा माटी के मोल...’, सागर यांनी ‘चला जाता हुं..., ओ मेरे दिल के चैन..., ठंडी हवा ये चांदनी सुहानी...’ तर श्रेया यांचे ‘बाहो मे चले आ...’ अशा सुरुवातीच्या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. पुढे ‘ये दिल सुन रहा है..., माना हो तुम..., रुक जाना नही..., मेरी भीगी भीगी सी..., दिल पुकारे..., मेरा प्यार भी तू है..., ओ बेकरार दिल..., चलते चलते युंही कोई..., गुम है किसी के प्यार मे..., लुटे कोई मन का नगर..., वो तो है अलबेला..., रात अकेली है..., तुम जो मिल गये हो...’ अशा विविधांगी गीतांनी कार्यक्रम बहरत गेला.सुरेल साथसंगत करताना किबोर्डवर राजा राठोड, रुग्वेद पांडे (गिटार), अमर शेंडे (व्हायोलिन), प्रशांत नागमोते (तबला), विक्रम जोशी (तुंबा) व ऑक्टोपॅडवर राजू ठाकूर यांनी समा बांधला.

 

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर