शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

ट्रकची कारला धडक; भीषण अपघातात दाेघांचा मृत्यू, दाम्पत्य गंभीर जखमी

By सुनील चरपे | Published: February 27, 2023 5:08 PM

अमरावती-नागपूर महामार्गावरील घटना

काेंढाळी (नागपूर) : वेगात जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जाेरात धडक दिली. त्यात कारचालकासह अन्य एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खुर्सापार येथील महामार्ग पाेलिस केंद्राजवळ साेमवारी (दि. २७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

कारचालक आदित्य सुखदेव माने (वय ३२, रा. मॉडेल कॉलनी, द्वीप बंगला चौक, पुणे) व बिसेन पवन मराठे (२२, रा. मानेगाव-बिरसा, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) अशी मृतांची, तर संतलाल कमललाल पंचेश्वर (२५) व रितू संतलाल पंचेश्वर (२०, दाेघेही रा. मानेगाव-बिरसा, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) अशी जखमींची नावे आहेत.

चाैघेही एमएच-०३/सीव्ही-११६८ क्रमांकाच्या कारने छत्रपती संभाजीनगर येथून अमरावती मार्गे नागपूरच्या दिशेने येत हाेते. दरम्यान, खुर्सापार शिवारात वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून नागपूर-अमरावती मार्गे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-४५/एई-६३९९ क्रमांकाच्या ट्रकने कारला जाेरात धडक दिली. त्यामुळे कारच्या दर्शनी भागाचा चुराडा हाेऊन ती रस्त्यावरच उलटली. यात दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले.

संजय गायकवाड यांनी दाेन्ही जखमींना लगेच काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दाेघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती डाॅ. पुष्पक खवशी यांनी दिली. शिवाय दाेघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

हाेळीनिमित्त गावी परतताना झाला घात

बिसेन, संतलाल व रितू हे छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीत कामगार म्हणून काम करायचे. हाेळीनिमित्त त्या तिघांनाही त्यांच्या मूळ गावी जायचे हाेते. आदित्य एकटाच एमएच-०३/सीव्ही-११६८ क्रमांकाच्या कारने पुण्याहून नागपूरला येत हाेता. त्यातच त्या तिघांना नागपूर मार्गेच बालाघाटकडे जायचे असल्याने आदित्यने त्यांना प्रवासी म्हणून कारमध्ये घेतले हाेते.

रस्ता दुरुस्ती अपघाताच्या पथ्यावर

हा राष्ट्रीय महामार्ग चाैपदरी असून, त्याला दुभाजक आहे. या महामार्गावर बहुतांश वाहने सुसाट वेगाने धावतात. या महामार्गावरील कोंढाळी-तळेगाव (जिल्हा वर्धा) या लेनच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या लेनवरील वाहतूक तळेगाव-कोंढाळी लेनवर वळवली आहे. एकाच लेनवरून दाेन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असल्याने हा अपघात झाला. अपघातामुळे या लेनवरील वाहतूक दाेन तास ठप्प हाेती.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर