शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

आकाशातून पडले धातूचे दोन गोळे; अनेकांना झाली स्कायलॅबची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2022 2:20 PM

ही स्कायलॅब पृथ्वीच्या वातावरणात कधी शिरणार, कुठे आणि कधी पडणार, यावर काही नियंत्रण नव्हते. त्यामुळे जगभरात गाेंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

नागपूर : शनिवारी आकाशातून अग्निगाेळे खाली काेसळल्यामुळे बहुतेक जुन्या जाणकारांना अमेरिकेच्या ‘स्कायलॅब’ची आठवण झाली. अमेरिकन अंतराळ संशाेधन संस्था नासाने अंतराळात पाठविलेली ही प्रयाेगशाळा पृथ्वीवर काेसळणार म्हणून १९७९ साली जगभरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले हाेते.

नासाने १४ मे १९७३ साली ‘स्कायलॅब’ नावाचे भव्यदिव्य व शक्तिशाली स्पेस स्टेशन अंतराळात नेले हाेते. ७७,१११ किलाेग्रॅम वजनाची ही अंतराळ प्रयाेगशाळाच हाेती. याचा मुख्य उद्देश मानवी शरीरावर दीर्घकाळात वजनरहित अवस्थेचा काय परिणाम हाेताे, याचा अभ्यास करणे हा हाेता. १९७३ ते १९७९ एवढा प्रदीर्घ वेळ ही प्रयाेगशाळा अंतराळात हाेती. त्या काळात एवढे प्रगत तंत्रज्ञान नव्हते. त्यामुळे ही स्कायलॅब अंतराळात नेली; पण ती सुरक्षितपणे पृथ्वीवर कशी आणायची किंवा अंतराळात कशी स्थापन करायची, हा ताळमेळ जुळला नाही आणि ही भव्यदिव्य प्रयाेगशाळा आपली कक्षा सांभाळू शकली नाही.

ही स्कायलॅब पृथ्वीच्या वातावरणात कधी शिरणार, कुठे आणि कधी पडणार, यावर काही नियंत्रण नव्हते. त्यामुळे जगभरात गाेंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान स्कायलॅब हिंद महासागर आणि ऑस्ट्रेलियाच्या ७४०० किलाेमीटरच्या परिघात काेसळेल असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया व भारतीय उपमहाद्वीपात राहणाऱ्यांमध्ये भीतीचा विस्फाेटच झाला. स्कायलॅब काेसळेल आणि आपण मरू, या भीतीने अक्षरश: लाेक सैरभैर झाल्याचे जुने जाणकार सांगतात. ११ जुलै १९७९ ला स्कायलॅब झपाट्याने पृथ्वीच्या दिशेने येऊ लागली. अखेर स्कायलॅबचा माेठा भाग हिंद महासागरात आणि काही भाग पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये काेसळला. सुदैवाने काेणतीही जीवितहानी झाली नाही. एक माेठा अनर्थ टळला आणि लाेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

रशिया-युक्रेन युद्धाचेही सावट

सध्या रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू आहे. त्याचा प्रभाव जनमानसावर आहे. शनिवारी अग्निगाेळे पडल्याने दाेन देशांतील युद्धाची व्याप्ती भारतापर्यंत आली की काय, अशा चर्चा सर्वत्र रंगली हाेती.

२०१२ ला काटाेलमध्ये उल्का

२२ मे २०१२ राेजी नागपूर जिल्ह्यातील काटाेलमध्ये अशाप्रकारे अग्निवर्षा झाली हाेती. त्यानंतर हा उल्कावर्षाव असल्याचे स्पष्ट झाले. भूगर्भ शास्त्रज्ञांनी त्याचे निरीक्षण केले हाेते. ७ ते ८ इंचीचे तुकडे जमा करून त्यावर अभ्यास करण्यात आला हाेता. शनिवारचा प्रकार उल्कावर्षाव नसल्याने भारतीय भूगर्भशास्त्र विभागाने हात वर केले.

टॅग्स :scienceविज्ञानnagpurनागपूरVidarbhaविदर्भSocialसामाजिक