शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खेळताना पाय घसरल्याने तलावात बुडून दोन बहिणींना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 17:15 IST

Nagpur News झोपडीसमोर खेळत असताना लहान बहीण जवळच असलेल्या तलावाच्या काठावर गेली. तिचा पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी मोठी बहीण सरसावली व तीही तलावात पडली.

नागपूर: झोपडीसमोर खेळत असताना लहान बहीण जवळच असलेल्या तलावाच्या काठावर गेली. तिला आणण्यासाठी मोठी बहीण तिच्या मागे गेली. त्यातच लहान बहिणीचा पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी मोठी बहीण सरसावली व तीही तलावात पडली. त्या दोघींनाही वाचविण्यासाठी परिसरात कुणीही नसल्याने त्या दोघींचाही बुडून दुदैर्वी मृत्यू झाला. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिकारपूर येथे रविवारी (दि. ३) सायंकाळी घडली असून, सोमवारी (दि. ४) सकाळी उघडकीस आली.आराध्या विचारकर मांढरे (२) व आकांक्षा विचारकर मांढरे (५) रा. शिकारपूर, ता. कुही अशी बहिणींची नावे आहेत. विचारकर मांढरे यांच्याकडे शेती अथवा उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने ते शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. विचारकर व त्यांची पत्नी रविवारी सकाळी शेतात कामाला गेले होते. आराध्या व आकांक्षा त्यांच्या आजोबासोबत घरी होत्या. सायंकाळच्या सुमारास आजोबा काही कामानिमित्त गावात गेल्याने दोघीही घरासमोर खेळत होत्या.दरम्यान, खेळता-खेळता आराध्या तलावाच्या काठावर गेली. तिला आणण्यासाठी आकांक्षा तिच्या मागे गेली. तलावाच्या काठावर ओली माती असल्याने आराध्याचा पाय घसरला व ती तलावातील पाण्यात पडली. त्यामुळे तिला वाचविण्यासाठी आकांक्षा पुढे सरसावली व पाय घसरल्याने तीही पाण्यात पडली. घटनेच्यावेळी तलावाजवळ कुणीही नव्हते. त्यामुळे त्या दोघी पाण्यात पडल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही.काही वेळाने आजोबा घरी आल्यावर त्यांना दोघीही झोपडीत अथवा अंगणात दिसल्या नाही. त्यामुळे त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. दोघीही तलावात बुडाल्याचे लक्षात येताच नागरिकांना बोलावले. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नीतेश डोर्लीकर व यादवराव कुंभरे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर दोघींच्याही पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.तलावाच्या काठी झोपडीशिकारपूर गावापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या काठी त्यांनी झोपडी बांधली असून, त्यात त्यांचे म्हातारे वडील, पत्नी व दोन मुलींसोबत वास्तव्य आहे. त्यांच्या झोपडीच्या परिसरात दुसरी झोपडी अथवा घर नाही. त्यांना आराध्या व आकांक्षा या दोनच मुली होत्या. घटनेची माहिती मिळताच आईवडिलांनी हंबरडा फोडला. एकाचवेळी दोघींचाही मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली होती.

टॅग्स :Deathमृत्यू