शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

‘वंदे भारत’ : २७ थांबे... जंगी स्वागत तरी आठ तासांत गाठले बिलासपूर!

By नरेश डोंगरे | Published: December 11, 2022 11:41 PM

अनेक वैशिष्ट्यांनी ओतप्रोत असलेल्या वंदे भारत ट्रेनचे नागपूर ते बिलासपूर या सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आजपासून आवागमन सुरू झाले.

नागपूर : वंदे भारत ट्रेनला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वेस्थानकावरून सकाळी ९.५४ वाजता ग्रीन सिग्नल दिला अन् महाराष्ट्र तसेच छत्तीसगडच्या दळणवळणाचा धागा घट्ट करत वायुवेगाने ती बिलासपूरकडे निघाली. मार्गात तब्बल २७ ठिकाणी हारतुरे अन् स्वागत स्वीकारण्यासाठी ती थांबली. मात्र, लगेच पुन्हा ऐट दाखवत तिने अवघ्या आठ तासात बिलासपूर गाठले.

प्रवासाची एक वेगळी अनुभूती देणाऱ्या वंदे भारत ट्रेनला रेल्वेलाइनवर चालणारे विमान म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. अनेक वैशिष्ट्यांनी ओतप्रोत असलेल्या वंदे भारत ट्रेनचे नागपूर ते बिलासपूर या सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आजपासून आवागमन सुरू झाले. तिच्या पहिल्या प्रवासाचा सोहळा ऐतिहासिकच ठरला. तिला शुभारंभाचा शगून दाखविण्यासाठी रेल्वेस्थानकावर एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी खास पंतप्रधान मोदी रेल्वेस्थानकावर आले. त्यांच्यासोबतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

नवरीसारखी नटून थटून फलाट क्रमांक एकवर उभ्या असलेल्या ‘वंदे भारत’च्या कोचचे निरीक्षण करून पंतप्रधानांनी ऑनबोर्ड सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर कंट्रोल रूम गाठत ट्रेन संचालनाची माहिती घेतली. दरम्यान, स्टाफशी चर्चा करून मोदींनी तिला हिरवा झेंडा दाखवला अन् पुढच्या काही क्षणातच ती वाऱ्यावर स्वार झाली. ६६८ निमंत्रितांना आणि पन्नासेक पत्रकारांना घेऊन कामठी, कन्हान स्थानकांना धावती भेट देत अवघ्या तासाभरात तिने भंडारा रेल्वेस्थानक गाठले. येथे प्रवासी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, स्थानिक नेत्यांनी तिला अक्षता लावून ओवाळले. बॅण्डच्या गजरात फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत चालकासह अन्य कर्मचाऱ्यांना मिठाई खाऊ घालण्यात आली. त्यानंतर तिरोडा, तुमसर, कोकातील दोन दोन मिनिटांचे स्वागत स्वीकारून ती दुपारी १२ च्या सुमारास गोंदिया स्थानकावर पोहचली. 

येथेही तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर राजनांदगाव, दुर्ग, रायपूर आणि मधे-मधे अनेक छोट्या स्थानकांवर अशाच प्रकारचा स्वागत सोहळा आटोपून सायंकाळी ६ च्या सुमारास ती बिलासपूरला पोहचली. येथे तिच्या स्वागताची जोरदार तयारी करून ठेवण्यात आली होती. स्थानकाला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. मोठ्या संख्येतील नागरिक, त्यांची घोषणाबाजी, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, कागदांची उधळण करणारे साैम्य स्वरूपाचे फटाके अशा प्रचंड उत्साहात वंदे भारतचा आजचा पहिला ऐतिहासिक प्रवास थांबला. सोमवारी ती पुन्हा नागपूरकडे येणार आहे.

गावोगावची मंडळी, मोहक रूपावर फिदाप्रवासाच्या दरम्यान तिला बघण्यासाठी तिचे मोहक रूप आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावरील मोठ्या स्थानकांवरच नव्हे तर विविध छोट्या गावांच्या स्थानकांवर, रेल्वे फाटकांवर मोठ्या संख्येत नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या देहबोलीतून ते वंदे भारतच्या रूपा-गुणांवर भाळल्याचे जाणवत होते.

ठिकठिकाणी झाले ‘लाइव्ह’प्रवासादरम्यान पहिल्या डब्यापासून १६ व्या डब्यापर्यंत विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी ‘लाइव्ह’ करून तिचे गुणगान करून देशातील जनेतला वैशिष्ट्य सांगत होते. नागपूर, बिलासपूरच नव्हे तर मुंबई, महाराष्ट्रासह, छत्तीसगड, मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थानमधूनही विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन वंदे भारतमधील प्रवास कसा आरामदायक आहे, ते कथन करीत होते.

काय ती गती, काय ती गाडी, एकदम ओक्केच!काय त्या सीटा, काय ती गती, काय ती गाडी, एकदम ओक्केच आहे. तिच्या दाराजवळ जाताच ते आपोआप उघडते अन् आपसूकच बंदही होते. सीटवर बसल्यानंतर ती पाहिजे त्या दिशेने (रिव्हॉल्व्हिंग) फिरविता येते. विमानाने आकाशात झेप घ्यावी, तशी ती वाऱ्यावर स्वार होऊन वायुवेगाने समोर निघते. या शिवायही तिची अनेक वैशिष्ट्ये आहेत. थोडक्यात सांगायचे म्हटले तर काय ती गती, काय ती गाडी, एकदम ओक्केच!

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस