शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

धक्कादायक... नाग नदीच्या विषयुक्त पाण्यावर पिकतो भाजीपाला; मार्केटमधून जातो प्रत्येकाच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 14:08 IST

शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देविषारी विळखा : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

 

दयानंद पाईकराव

नागपूर : आरोग्य उत्तम राहावे म्हणून आपण महाग असल्या तरी, पालेभाज्या बाजारातून खरेदी करून आणून खातोच. परंतु या पालेभाज्या विषयुक्त असल्याचे सांगितल्यास, ते कोणालाच पटणार नाही. परंतु हे धक्कादायक वास्तव आहे.

नागपूरशेजारील नाग नदीला लागून असलेल्या जवळपास सर्वच गावांत नाग नदीचे केमिकलयुक्त विषारी पाणी वापरून भाजीपाला आणि इतर पिके पिकवली जात आहेत. ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या ‘ऑन दि स्पॉट’ पाहणीत हे घाबरवून सोडणारे चित्र समोर आले. हा विषारी भाजीपाला खाऊन नागपूरकरांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले. नाग नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प सध्या तरी कागदावरच आहे. मात्र, तोवर नागपूर शहरातील सांडपाणी, सिवरेजचे पाणी नाग नदीत कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये, यासाठी महापालिकेने दखल घेऊन तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

नाग नदीवर जागोजागी मोटरपंप

नाग नदीपासून अनेक शेतकऱ्यांची शेती २०० मीटर ते पाऊण किलोमीटरवर आहे. नाग नदीच्या काठावर जागोजागी शेकडो पाण्याचे मोटरपंप बसविलेले आहेत. जमिनीखालून टाकलेल्या पाईपलाईनच्या माध्यमातूनही शेतकरी हे दूषित पाणी आपल्या शेतापर्यंत घेऊन जात असल्याचे आढळून आले.

दूषित पाण्यावर पिकते मेथी, पालक, कोबी

- नाग नदीच्या दूषित पाण्याचा वापर करून गहू, चेच भाजी, पालक, मेथी, अंबाडी, भेंडी, ढेमस, संत्रा, लिंबू, सोयाबीन, वांगी, लवकी, सांबार, कोबी ही भाजीपाला पिके घेण्यात येतात. त्यासाठी नाग नदीच्या दूषित पाण्याचा वापर केल्यामुळे जमिनीचा कस खराब होतो. तसेच या पाण्यावर घेतलेल्या भाजीपाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची बाब काही शेतकऱ्यांनी मान्य केली.

या गावातील शेती नाग नदीच्या पाण्यावर...

- नाग नदीला लागून असलेल्या जवळपास सर्वच गावांत नाग नदीचे दूषित पाणी वापरून विषयुक्त भाजीपाला पिकवला जातो. यात पुणापूर, पावनगाव, धारगाव, शिरपूर, आसोली, महालगाव, कापसी, आरंभा, तितुर, तरोडी, खेडी, कुही, मांढळ आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेतीvegetableभाज्याnagpurनागपूरpollutionप्रदूषण