शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उपराजधानीत वर्षभरात विना हेल्मेट ६१२ दुचाकीस्वारांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 11:12 IST

२०१९ या वर्षात विविध अपघातामध्ये जखमी झालेल्या ३६८४ चालकांना नागपूर मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान यातील ८०० चालकांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देमेडिकलच्या ‘ट्रॉमा’मधील वर्षभरातील आकडेवारी वाहन चालविताना मोबाईलवर बोलणेही ठरते मृत्यूला कारण

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विना हेल्मेट प्रवास जीवघेणा ठरतो, असे असताना देखील बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट टाळतात. परिणामी, अपघात झाल्यास मेंदूला जबर मार बसून गंभीर जखमी होतात. २०१९ या वर्षात विविध अपघातामध्ये जखमी झालेल्या ३६८४ चालकांना मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान यातील ८०० चालकांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, यात विना हेल्मेट चालकांची संख्या ६१२ होती.रस्ते अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मेडिकलने ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू केले. या सेंटरमध्ये गेल्या तीन वर्षांत जखमींची संख्या वाढली आहे. २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची चमू येथे कार्यरत असल्याने हे ‘सेंटर’ अनेकांसाठी वरदान ठरत आहे. परंतु अपघातांच्या वाढत्या संख्येने रुग्णांची संख्याही वाढली आहे. विशेष म्हणजे, हेल्मेटचा सक्तीचा वापर करण्याचा शासनाकडून प्रयत्न होत आहे. वाहतूक पोलीस विभागाकडून विना हेल्मेट चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करीत आहे. मात्र, हेल्मेटचे महत्त्व माहीत असताना सुद्धा बहुसंख्य दुचाकीचालक त्याच्याकडे ओझे म्हणून पाहतात. यामुळे चौकात पोलीस असतील तरच हेल्मेट घालण्याचे किंवा पळवाटा शोधण्याची वृत्ती वाढत असल्याने रस्ता अपघातात विना हेल्मेट वाहनधारक गंभीर जखमी होत असून मृत्यूच्या दारात पोहचत आहे.गेल्या वर्षभरात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ६१२ चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणेही २१ चालकांसाठी मृत्यूचे कारण ठरले.

जखमींमध्ये ९० टक्के चालक विना हेल्मेटजानेवारी ते डिसेंबरपर्यंत ट्रॉमा केअर सेंटरमध्ये येणाऱ्या जखमींची माहिती गोळा करण्यात आली आहे. यात रस्ता अपघातात जखमी झालेल्या ९० टक्के दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. यातील ७६ टक्के जखमींना जीवाला मुकावे लागले. ही धक्कादायक वस्तूस्थिती आहे.डॉ. मोहम्मद फैजल, प्रमुख, आर्थाेपेडिक विभाग व ट्रॉमा केअर सेंटर

मोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु हेल्मेट नसताना आणि ४५ किमी प्रतितासाच्या वेगाने चालणाºया मोटारसायकलीवरून चालक खाली पडल्यास त्याला चारपट गतीने मार लागतो. यात डोक्याचे हाड तुटण्याची व मेंदूला जबर मार बसण्याची शक्यता असते. ‘रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये विना हेल्मेट असलेल्या चालकांची संख्या मोठी आहे. मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वारांच्या मृत्यूची संख्या पाहता हेल्मेटचे गांभीर्य आवश्यक आहे.-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल२० ते ४० वयोगटात सर्वाधिक मृत्यूट्रॉमा केअर सेंटरने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे. यात २० ते ४० या वगोटातील तरुण जास्त आहेत. अशा वयोगटातील तरुणांवरच त्यांच्या कुटुंबाची व वयोवृद्ध पालकांची जबाबदारी असते. त्यांच्या निधनाने त्यांचे अख्खे घर पोरके होऊन जात असते.

टॅग्स :Accidentअपघात