शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खासदारांच्या कार्यालयात जाऊन विदर्भवादी मागणार राजीनामा - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2022 13:09 IST

हिवाळी अधिवेशनावर करणार हल्लाबोल

नागपूर : लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तेत येऊनही विदर्भाचे राज्य मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या विदर्भातील १० खासदारांच्या कार्यालयात जाऊन ११ नोव्हेंबरला विदर्भवादी त्यांचा राजीनामा मागणार आहेत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वामनराव चटप म्हणाले, १९ ऑक्टोबरला गिरीपेठ येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुख्यालयात प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भवाद्यांची बैठक झाली. यात मिशन २०२३ संपेपर्यंत आर-पारची लढाई लढण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार १० नोव्हेंबरपर्यंत विदर्भातील १० खासदारांच्या मतदार संघातील विदर्भवादी वेगळ्या विदर्भाबाबत त्यांची काय भूमिका आहे, याचा जाब पोस्टाद्वारे आणि ई-मेलद्वारे मागणार आहेत. त्यानंतर ११ नोव्हेंबरला खासदारांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा राजीनामा मागण्यात येणार आहे. विदर्भ राज्य मिळवून देण्यात अपयशी ठरल्यामुळे खासदारांनी खुर्चीत राहण्याचा अधिकार गमावला असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, वेगळे विदर्भ राज्य निर्मितीसाठी केंद्र सरकारला भाग पाडावे, यासाठी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १९ डिसेंबरला विधिमंडळावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. यात १० हजार विदर्भवादी सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार, नरेश निमजे, मुकेश मासुरकर, प्रबीर कुमार चक्रवर्ती, रेखा निमजे, रंजना मामर्डे, सुधा पावडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणWamanrao Chatapवामनराव चटपWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर