शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

२८ सप्टेंबरला विदर्भात नागपूर कराराची होळी; ६४ वर्षांत राज्यकर्त्यांकडून सतत उपेक्षा!

By नरेश डोंगरे | Published: September 21, 2024 12:01 AM

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा एल्गार

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महाराष्ट्राची निर्मिती होऊन ६४ वर्षे झाली. मात्र, या कालावधीत सातत्याने विदर्भावर अन्यायच होत आहे. राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे विदर्भातील विकासाची वाट लागली आहे, त्याच्या निषेधार्थ येत्या २८ सप्टेंबरला विदर्भातील सर्व जिल्हा तसेच तालुकास्थळावर 'नागपूर कराराची' होळी करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आ. ॲड वामनराव चटप यांनी दिली.

विदर्भात बारमाही नद्या आहेत. विपुल खनिज आणि वनसंपदा आहे. कुशल मनुष्यबळ आहे. मात्र, एवढे सर्व असूनही विदर्भाचा विकास झालेला नाही. विदर्भातील सिंचनाचा प्रश्न, दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी एकीकडे चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे येथील कोळसा, वीज दुसऱ्या प्रदेशांत पाठविली जाते. हवालदिल शेतकरी, त्याचे कुटुंबीय आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. त्यामुळे सरकारला इशारा देण्यासाठी २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी डॉ. श्रीनिवास खांदेवाले, रंजनाताई मामर्डे, अरुण केदार, मुकेश मासूरकर, प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, नरेश निमजे, प्रशांत नखाते, गुलाबराव धांडे, अशोक धापोडकर, गंगाधर मुंडकर आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ