शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

विदर्भाचा प्रस्ताव बासनात गुंडाळला, विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांचा आरोप

By मंगेश व्यवहारे | Updated: December 20, 2023 19:37 IST

याच कारणावरून विरोधकांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभात्याग करीत आंदोलन केले.

नागपूर :  विधानसभेत विदर्भाच्या चर्चेचा प्रस्ताव असताना सत्ताधाऱ्यांनी या प्रस्तावावर चर्चा न करता तो बासनात गुंडाळून विदर्भाची घोर निराशा केली असा सनसनाटी आरोप, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

याच कारणावरून विरोधकांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभात्याग करीत आंदोलन केले. वर्षा गायकवाड यांनी विदर्भाच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली मात्र त्यांना गप्प बसवून कामकाज रेटण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी विदर्भाच्या सर्व मुद्यांवर २९३ अन्वये चर्चेसाठी मांडला होता. परंतू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तो टाळून अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेला घेतला. सत्ताधाऱ्यांचा हा डाव विरोधकांची मुस्कटदाबी करणारा आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. कारण सत्ताधाऱ्यांना लवकरात लवकर कामकाज आणि अधिवेशन गुंडाळून नवी दिल्लीचे विमान गाठायचे होते. संयुक्त महाराष्ट्राचा करारात विदर्भात अधिवेशन अधिवेशन घेऊन विदर्भातील मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित होते. सत्ताधारी स्वतःच प्रस्वाव मांडतात आणि ऑर्डर ही विधानसभा चालविण्याची पद्धत नव्हे.

ऑफ डे मध्ये प्रस्ताव असतानाही तो सभागृहात चर्चेला घेतला जात नाही. हा प्रकार निंदनिय असून, ही  विधानसभा चालविण्याची पद्धत नाही, जितेंद्र आव्हाड म्हणाले. विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाही, ही एकप्रकारे थट्टा सुरू असल्याचेही  आव्हाड म्हणाले. 

सत्ताधाऱ्यांचा चर्चेतून पळ- अनिल देशमुखसंयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचा समावेश करताना नागपूर करारानुसार अधिवेशन विदर्भात घेण्याचे ठरले होते. त्यासाठी हिवाळी अधिवेशन दिड महिने चालायला हवे. थातूर मातूर पॅकेज देऊन विदर्भावर अन्याय करण्याची एकही संधी सरकारने सोडलेली नाही. विदर्भातील सिंचनाचे, शेतकऱ्याचे, विजेचे प्रश्न आ वासून उभे आहेत.त्यात  विदर्भात येऊ घातलेले मोठ मोठे उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. अशा मुद्यांवरून विरोधकांनी विदर्भातल्या समस्यांवर चर्चेची मागणी केली होती. मात्र या चर्चेतून सत्ताधारी पळ काढत आहेत, असे आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन