शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
2
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
3
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
4
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
5
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
6
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
7
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
8
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
9
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
10
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
11
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
12
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
13
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
14
Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट
15
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ
16
तुम्ही लढत बसाल, वकील खुश होतील; घटस्फोटाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश काय बोलले?
17
"आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत PM मोदींना विनाकारण ओढलं, प्रार्थना करतो की...'; शाह यांचा खर्गेंवर पलटवार
18
नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले
19
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
20
अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?

ग्रामविकासात ग्रामस्थांचा सहभाग हवा

By admin | Published: February 21, 2017 2:11 AM

रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्थानिक नागरिकांना केंद्रस्थानी मानून त्यांना विकास कामात सक्रिय सहभागी करून घेणे गरजेचे आहे.

सुधीर ठाकरे : पंचायत राज विभागातर्फे चर्चासत्र नागपूर : ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्थानिक नागरिकांना केंद्रस्थानी मानून त्यांना विकास कामात सक्रिय सहभागी करून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या सहभागानेच केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येते, असे मत केंद्राच्या पंचायत राज विभागाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी मांडले. नाग विदर्भ चेंबर येथे आयोजित ‘ग्रामविकासाची भावी दिशा व उद्दिष्टे’ सुंदर, विकसित व परिपूर्ण गाव या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. कृषी महाविद्यालय नागपूर व अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो.इंजि. मित्र परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रादेशिक सुदूर संवेदना केंद्राचे मिलिंद वडोतकर, रोटरी क्लबचे मनीष भाटे, जनमंचचे प्रमोद पांडे, अमिताभ पावडे, रेड स्वास्तिकचे मिलिंद नाईक, नागपूर सेंद्रीय शेतीचे हरिसिंग चव्हाण, विकल्पा(ग्रामीण शिक्षण)चे सचिन देशपांडे इत्यादी उपस्थित होते. यावेळी राज्याच्या निर्मितीपासून ते आजपावेतो ग्रामविकासासाठी नेमलेल्या विविध समित्यांच्या कामाबाबत माहिती देताना ठाकरे म्हणाले की, ग्रामविकास हा सूक्ष्म नियोजनाशिवाय आणि गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे हिवरा बाजारसारख्या विकसित गावांमुळे सिद्ध झाले आहे. अराजकीय व्यक्ती आणि प्रत्यक्ष कामातून घडवून आणलेला ग्राम विकासातील बदल होणे गरजेचे आहे. स्मार्ट व्हिलेज हे स्मार्टसिटीपेक्षा तितकेच महत्त्वाचे असून गावातील पैसा गावातच, सोबतच शहरातील पैसाही गावातच आणण्यावर भर देऊन कृषी विभागाची सिंचनक्षमता वाढविणे, कृषी उत्पादन आणि उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जवळच बाजारपेठा निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सुधीर ठाकरे यांनी केले. ग्रामीण जनतेवर विश्वास टाकून समाजाचा ग्रामविकासात सहभाग वाढवून जे काम स्थानिक पातळीवर होते, तेच काम ग्रामविकासासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकांना विचार करायला भाग पाडले पाहिजे. तरच ग्रामविकास घडून येऊ शकतो. सेंद्रीय शेती, सिंचन, बाजारपेठा, नवनव्या उपग्रहाचा कृषी विकासासाठी वापर, जल आणि मृदासंधारण, साक्षरता, कृषी व कृषिपूरक उद्योग सुरू करणे, सीड व्हिलेज, खत आणि निविष्ठा, कडूनिंब प्रकल्प आदी विषयांवर उपस्थितांनी या चर्चासत्रात आपली मते मांडली. (प्रतिनिधी)