शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

रिटायर्ड हवेत की फ्रेश?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 8:55 AM

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची मानधन तत्त्वावर एका वर्षासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाने घेतला. या निर्णयामागील तर्क आणि न्यायसंगती याची चर्चा सुरू आहे.

बालाजी देवर्जनकर, मुख्य उपसंपादक, नागपूर 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची मानधन तत्त्वावर एका वर्षासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाने घेतला. या निर्णयामागील तर्क आणि न्यायसंगती याची चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या स्थितीची केलेली ही संक्षिप्त चिकित्सा...

शिक्षण हक्क कायदा येऊन फक्त १३ वर्षे झाली. ६ ते १४ वयोगटातील पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुलांचा शिक्षण हक्क आहे. हा हक्क मुलांना उपलब्ध करून देणे पालक म्हणून शासनाचे कर्तव्य ठरते. राज्यातील शाळांना आज शिक्षकांची मोठी गरज आहे. गेली अनेक वर्षे भरती न झाल्याने शाळांना शिक्षकच उपलब्ध झाले नाहीत. सरकारी व खासगी अनुदानित शाळांतही शिक्षक टंचाई आहे. नोकरीच्या अपेक्षेने हजारो तरुणांनी टीईटी, सीईटी पास केली. त्यापैकी अनेकांची वयोमर्यादा भरतीच्या प्रतीक्षेतच पार झाली.

शिक्षण विभागात अजूनही शिक्षणसेवक योजना लागू आहे. मात्र, नव्या दमाचे शिक्षक देण्याऐवजी सेवानिवृत्तांना संधी देणे हा निर्णय कितपत योग्य आहे, याचा विचार करावा लागेल. तलाठीपदाच्या ३६ हजार जागांसाठी साडेअकरा लाख अर्ज आले. यावरून बेरोजगारीचे भीषण वास्तव नजरेत येते. शिक्षक पात्रता मिळवलेल्या बेरोजगार तरुणांचीही संख्या खूप मोठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सेवानिवृत्तांना त्यांचे निवृत्तीपश्चातचे जीवन शांतपणे व्यतीत करू द्यावे आणि नव्या दमाचे शिक्षक आणावेत, असा एक विचारप्रवाह आहे. शिक्षणावर दरडोई उत्पन्नाच्या ६ टक्के निधी खर्च करण्याचा आदर्श केवळ अहवालाच्या नस्तीत बंद करून चालणार नाही. नव्याने आलेल्या शिक्षण धोरणात शिक्षककेंद्रित धोरणांची योजना करून त्या प्रत्यक्षात आणण्याचा विचार मांडला आहे.

राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची बाबही नुकतीच समोर आली आहे. शासकीय शिक्षणाची ही दुरवस्था गांभीर्याने घेतली पाहिजे. शिक्षक आणि मुलांवर विविध उपक्रमांचा भडीमार व एका उपक्रमाचे फलित कळण्यापूर्वीच दुसरा उपक्रम चालू करणे, या व अशा इतर अनेक कारणांमुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असल्याचे निरीक्षण वारंवार तज्ज्ञांकडून मांडले जाते. शिक्षकाला शाळेत शिकविण्याबरोबर किती कामे आहेत याची यादी पाहिली तर आश्चर्य वाटेल. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या झपाट्याने कमी होण्यावर होत आहे. आधीच शिक्षक कमी आणि त्यात हे प्रयोग. गुणवत्ता घसरण्यासाठी मग सरसकट शिक्षकांनाच दोषी ठरवले जाते. ते कितपत योग्य आहे, याचा सांगोपांग विचार झाला पाहिजे.